या वर्षी रंगपंचमी 4 मार्च रोजी साजरी केली जाईल. रंगपंचमीचा हा उत्सव देशभरात प्रसिद्ध आहे.(Rangpanchami) पण तुम्हाला माहित आहे का की अशीही काही ठिकाणे आहेत जिथे रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. चला कोणती आहेत अशी ठिकाणं ती जाणून घेऊयात.

रंगपंचमीचा हा उत्सव आपण प्रत्येकजण मोठ्या उत्साहात साजरे करतो. पण जेव्हाही आपण या रंगपंचमी सणाबद्दल विचार करतो तेव्हा सर्वात आधी आपल्या मनात मथुरा-वृंदावनची रंगपंचमी आठवते. कारण या ठिकाणी आगळीवेगळी काठ्यांची आणि फुलांनी भरलेली होळी खेळली जाते. राधा-कृष्ण यांच्या पावन भुमित दिसणारा रंगांचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संगम खरोखरच अनोखा आहे. त्यामुळे हे क्षण पाहण्यासाठी लोकं दूरदूरून येतात. काही लोकं दरवर्षी होळी साजरी करण्यासाठी मथुरा येथे आर्वजुन जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की हा रंगपंचमीचा सण केवळ मथुरा आणि वृंदावनमध्येच नाही तर देशाच्या अनेक भागात वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
रंगपंचमी हा सण केवळ रंगांचा सण नाही तर तो हृदयांमधील दरी भरून काढण्याची, भूतकाळातील द्वेष विसरून जाण्याची आणि नात्यांमध्ये नवीन गोडवा जोडण्याची संधी आहे. (Rangpanchami)वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या लेखात अशा पाच ठिकाणांबद्दल आपण जाणून घेऊयात.बरसाना येथील रंगपंचमी साजरी करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. जगभरात लाठमार होळी म्हणून ओळखली जाते. तर या ठिकाणी महिला प्रतीकात्मकपणे लाठ्यांनी पुरुषांवर हल्ला करतात, तर पुरुष ढालींनी स्वतःचे रक्षण करतात. ही परंपरा राधा आणि कृष्णाच्या लीलांशी जोडलेली असल्याचे मानले जाते. रंग आणि भक्तीचे हे अनोखे मिश्रण बरसनाची होळी अद्वितीय बनवते.
वाराणसीमध्येही रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने होते साजरीकाशीतील रंगपंचमी ही अध्यात्म आणि मौजमजेचे एक अनोखे मिश्रण आहे. केवळ दिवाळीच नाही तर रंगपंचमी ही खरोखरच नेत्रदीपक आहे. गंगेचे घाट रंग, संगीत, भांग आणि थंडाई यांनी भरलेले असतात. शिवभक्तांची गर्दी, ढोल-ताशांचे गजर आणि घाटांवर गुलालाची उधळण हे सर्व एकत्रितपणे वाराणसीतील रंगपंचमीला खरोखरच खास बनवते.
शांतिनिकेतनची अनोखी रंगपंचमी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनमध्ये रंगपंचमी हा वसंतोत्सव म्हणून साजरा केला जातो. येथे रवींद्रनाथ टागोरांची परंपरा रंगांशी जोडली गेली आहे. विद्यार्थी पिवळे कपडे परिधान करतात आणि गाणी, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे वसंत ऋतू आणि रंगपंचमीचे स्वागत करतात. (Rangpanchami)ही रंगपंचमी आवाजपेक्षा सौंदर्य आणि कलेचे प्रतीक मानली जाते. जर तुम्हाला शांत आणि आरामदायी रंगपंचमी साजरी करायची असेल तर तुम्ही शांतिनिकेतनला भेट देऊ शकता.
उदयपूरची रंगपंचमी त्यांच्या राजेशाहीसाठी ओळखली जाते. मेवाड राजघराण्याच्या परंपरेचे पालन करून येथे होलिका दहन आणि भव्य मिरवणुका काढल्या जातात. शाही पोशाख, सजवलेले हत्ती आणि घोडे आणि लोकनृत्य उदयपूरची रंगपंचमी खरोखरच शाही उत्सव बनवते. शाही अनुभवासाठी तुम्ही होळीकरिता उदयपूरला नक्कीच भेट द्यावी.
प्रयागराजमध्ये मोठ्या उत्साहात रंगपंचमी होते साजरीप्रयागराजमधील संगम शहर देखील एका अनोख्या पद्धतीने रंगपंचमी साजरी करतात. कपडा फाड रंगपंचमी खूप लोकप्रिय सण येथे साजरा केला जातो, जिथे शेजारी शेजारी सामूहिक रंगपंचमी साजरी केली जाते, जिथे पुरुष एकमेकांचे कपडे फाडतात. शिवाय, संगीत आणि एकत्रितपणा यामुळे रंगपंचमीला एक विशेष प्रेम दिलं जातं.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!