अंगावर काटा आणणारा प्रसंग धाराशिवमध्ये घडला आहे. एका 13 महिन्यांच्या चिमुकलीचा गळा काकाने दाबून तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकाराने सगळेच हादरुन गेले आहे.

अवघ्या 13 महिन्यांच्या निष्पाप मुलीची तिच्या सख्ख्या काकानेच हत्या केली आहे. (13-month-old) हा संपूर्ण प्रकार इतका संतापजनक आहे. काकाने लहान मुलीची गळा चिरुन हत्या केली. क्रूर काका एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या शरीराचे सात तुकडे केले आणि ते शेतात पुरले. थरकाप उडवणारा हा प्रकार धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी शिवारात घडली आहे. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे आणि आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

गवळेवाडी येथे 13 महिन्यांची आराध्या तिच्या वडिलांसोबत राहायची. 27 फेब्रुवारी रोजी आराध्या बेपत्ता झाली. 28 रोजी आराध्याचे वडील महादेव माने (13-month-old) यांनी तमालवाडी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केली. पोलिसांनी खबरीने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी काका शंकेश मानेसोबत दिसली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराध्याची आई परपुरुषासोबत पळून गेली. ही मुलगी आपल्या भावाची नाही असा संशय शंकेश मानेच्या मनात होता. 27 फेब्रुवारी रोजी त्याने पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास आराध्याला शेतात नेले. तिथे गळादाबून तिची हत्या केली. काका एवढ्यावरच थांबला नाही तर रागाच्या भरात त्याने आराध्याचे सात तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे तुकडे शेतात पुरले.

शाळेत सतत दादागिरी करतो म्हणून तीन वर्गमित्रांनी शाळकरी मुलाची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिल्याची घटना भांडुपमध्ये घडली. सिद्धार्थ लोंढे (१४), असे मृत मुलाचे नाव आहे. तो आठवीत शिक्षण घेत होता. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सिद्धार्थ याला वडील ओरडले होते. तेव्हापासून राग मनात धरून होता. दुपारी कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर तो 3 वाजताच्या सुमारास खेळायला जातो, असे सांगून तो घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी आला नसल्याने आई-वडिलांनी परिसरात त्याचा शोध घेत त्याचे मित्र आणि
केली; पण तो सापडला नाही. सिद्धार्थच्या आईने भांडुप पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा हरविल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू होता. (13-month-old) दुसन्या दिवशी विहार लेक तलावात सिद्धार्थचा मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज होता. परंतु राजावाडीतील शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर मार लागल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तपासाची दिशा बदलली.

घटनेच्या वेळी सिद्धार्थ याचा याच परिसरातील १४ वर्षीय मित्रासोबत असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या संशयित मित्राला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणून चौकशी करताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. सिद्धार्थच्या मित्राने हत्येची कबुली देत अन्य दोन मित्र त्यावेळी गुन्ह्यात सोबत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मित्रांना टेंभीपाडा येथून ताब्यात घेतले. सिद्धार्थच्या डोक्यात काठीने प्रहार करून त्याला ठार करून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *