30 वर्षांपूर्वी मेलेल्या मुलीसाठी नवरा शोधतंय कुटुंब सत्य ऐकून थरथर कापाल

सध्या सोशल मीडियावर घोस्ट मॅरेजची खूप चर्चा आहे. खरं तर, कर्नाटकातील एका कुटुंबाने (people search)30 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी वर शोधत असल्याची जाहिरात प्रकाशित केली होती, जी इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो, ज्याला अविस्मरणीय बनवण्यासाठी पसर्वच जण खूप मेहनत घेतात. लग्नाचे अनेक प्रकारचे विधी आणि परंपरा जगभर प्रसिद्ध आहेत. भारतातच शेकडो पद्धतीने लग्न केले जाते. धर्म, जाती नुसार लग्नाचे विविध प्रकार आहेत., पण तुम्ही कधी घोस्ट मॅरेजबद्दल ऐकले आहे का? जर तुम्ही पहिल्यांदा हा शब्द ऐकत असलं आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटले असेल.
तर सर्वात आधी हे लक्षात घ्या की ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही. ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे आणि आपल्या भारतातच पूर्ण विधींनी आयोजित केली आहे. चला जाणून घेऊया घोस्ट मॅरेज अर्थात भूतविवाह म्हणजे काय आणि काय आहे हे गौडबंगाल?
भूतविवाहाची संस्कृती अनेक ठिकाणी प्रदीर्घ काळापासून आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून ती जास्त चर्चेत आहे. कारण अलीकडेच सोशल मीडियावर एका लग्नाची जाहिरात येताच ती चांगलीच व्हायरल झाली, त्यानंतर भूत विवाहअर्थात घोस्ट मॅरेज ट्रेडिंग झाले. या जाहिरातीनुसार, एक कुटुंब 30 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या आपल्या मुलीच्या लग्नासाठी 30 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलाचा शोध घेत होते. ही एक लग्नाची परंपरा आहे ज्याला ‘कुले मदिम’ किंवा ‘प्रेथा मदुवे’ म्हणतात
ही शतकानुशतके जुनी परंपरा आहे जी जगभरातील अनेक संस्कृतींचा भाग आहे. (people search)वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ही गोष्ट ओळखली जाते. ही परंपरा दक्षिण कर्नाटकातील समुद्राच्या बाजूला बसलेले काही जिल्हे आणि तुलुनाडूच्या उडुपी आणि चीनमध्ये दिसून येते. ज्याला ‘कुले मदिम’, ‘प्रेथा मदुवे’ किंवा ‘चायनीज घोस्ट मॅरेज’ म्हणून ओळखले जाते. ही परंपरा सामान्यतः पुनर्जन्मावरील विश्वासावर आधारित आहे. असे म्हटले जाते की अशा परंपरा मृत व्यक्तीच्या आत्म्याला आनंदी, समाधानी राहण्यास आणि दुसऱ्या जगात एकटे न राहण्यास मदत करतात.
प्रेथा मदुवे किंवा भूत विवाह समारंभ लहानपणी किंवा 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मरण पावलेल्यांसाठी आयोजित केला जातो. या व्यक्ती हयात नसल्या तरी त्यांचा आत्मा जिवंत आहे असे समजून लग्नाचे वय झाल्यानंतर हा सोहळा केला जातो. हा विवाह करण्यामागील धारणा अशी आहे की, मृत व्यक्ती प्रत्यक्षात मृत नसून ती त्याच्या कुटुंबात आत्म्याच्या रूपात असते. अशा परिस्थितीत, दोन मृत जीवांचे मिलन घडवून, कुटुंबे आपल्या दिवंगत मुलांना समाधान मिळेल अशी अशा व्यक्त करतात. हा विवाह सोहळा नेहमीच्या लग्नाप्रमाणेच रितीरिवाज आणि विधींनी पार पाडला जातो.

भारताच्या काही भागांव्यतिरिक्त चीनमध्येही भूतविवाहाची प्रथा प्रचलित आहे(people search), ज्यामध्ये दोन मृत व्यक्तींचे लग्न केला जाते. ही प्रथा 3,000 वर्षांपासून प्रचलित आहे आणि असे मानले जाते की मृत्यूच्या वेळी जे अविवाहित होते ते या विवाहानंतर मृत्यूनंतर एकटे राहत नाहीत.तर, तैवानमध्ये, मृत व्यक्तीचे जिवंत व्यक्तीशी लग्न लावण्याची अनोखी प्रथा आहे.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुमारीका किंवा सौभाग्यवती स्त्री मरण पावल्यावर तिला नवरीसारखाच निरोप दिला जातो. कुमारीका मुलींचे लग्न न झाल्याने त्यांची कोणतीही इच्छा अपूर्ण राहून आत्मा भटकत राहू नये म्हणून त्यांना विविध सौभाग्यलंकारांनी सजवले जाते. जसे की नवीकोरी साडी, मंगळसूत्र, टिकली, गजरा, सिंदूर, बांगड्या, नथ ही आभुषणे घालूनच तिचे अंत्यसंस्कार केले जातात तर सौभाग्यवती स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मी असते तिलाही त्याच रूपात निरोप दिला जातो.
हेही वाचा :
सांगली येथील सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला पोलीस विभागाची परवानगी!
मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
उच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट