भारतासह जगभरात सर्वच चहाप्रेमी आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन होते. (inflammation )तर काहींना दिवसभरात अनेकवेळा चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्यानंतर खूप फ्रेश वाटते. पण सतत चहा किंवा कॉफी पिणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. चहा कॉफी बनवताना दुधाचा वापर केला जातो. पण दुधाचा चहा प्यायल्यामुळे शरीरात जळजळ किंवा ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. चहा कॉफीमध्ये जास्त प्रमाणात केफिन असते, जे आरोग्यसाठी फायदेशीर नाही.
सतत चहाचे सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे दिवसभरातून एकदा किंवा दोनदाच चहा प्यावा. चहा कॉफीच्या सेवनामुळे छातीत जळजळ आणि अॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चहा कॉफी प्यायल्यानंतर शरीरात जळजळ वाढू नये म्हणून कोणते उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात जळजळ किंवा अॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सतत चहाचे सेवन करू नये. याशिवाय शरीरात अपचन, उलट्या, मळमळ किंवा आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे चहा कॉफीचे सेवन करण्याऐवजी दूध किंवा इतर पेयांचे सेवन करावे. (inflammation )मिल्कशेक प्यायल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि संपूर्ण दिवस आनंद उत्साहात जातो.
चुकीच्या पद्धतीने चहा प्यायल्यास अॅसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. सतत चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात जळजळ वाढू लागते. यामध्ये असलेल्या टॅनिनमुळे गट लानिंगचं नुकसान होऊ लागते. ज्यामुळे पोटातील आतडयांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. अॅसिडिटी किंवा छातीत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी थंड पेयांचे किंवा नारळ पाण्याचे सेवन करावे. चहासोबत कधीच चटपटीत पदार्थांचे सेवन करू नये.
मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचू लागते. यामध्ये असलेले मसालेदार घटक आणि दूध शरीरात अॅसिडचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे चहा पिताना कधीही चिप्स किंवा तिखट पदार्थ खाऊ नये.गर्मीच्या दिवसांमध्ये सतत चहा कॉफीच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात अनेक बदल दिसून येतात. (inflammation )वाढत्या उष्णतेमुळे पोटात गर्मी वाढते आणि सतत जळजळ किंवा ऍसिडिटी वाढू लागते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर कोणत्याही ऋतूमध्ये जास्त चहाचे सेवन करू नये. त्यामुळे नियमित कमीत कमी चहा प्यावा.
हेही वाचा :