इराण-इस्रायल युद्धामुळे भारताला मोठा फटका; ‘या’ वस्तूची निर्यात थांबली, किमती प्रचंड घसरल्या

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता भारतावरही स्पष्टपणे दिसू लागले आहेत.(exports) विशेषतः भारतीय तांदूळ निर्यातदारांवर याचा मोठा फटका बसला आहे. युद्धामुळे इराणमधील बंदरे ठप्प झाली असून, भारतातून होणारी बासमती तांदळाची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील सुमारे एक लाख मेट्रिक टन तांदूळ बंदरांवरच अडकलेला आहे.या परिस्थितीमुळे बासमती तांदळाच्या किमतींमध्येही प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपयांची घसरण झाली आहे. जे तांदूळ याआधी 2200-2300 रुपयांना विकला जात होता, तो आता केवळ 1200 रुपयांना उपलब्ध आहे. यामुळे निर्यातदारांच्या महसुलात प्रचंड घट झाली असून, संपूर्ण तांदूळ उद्योग संकटात सापडला आहे.

 

कोट्यवधींचा तांदूळ विम्याविना अडकला
निर्यातदारांची सगळ्यात मोठी चिंता म्हणजे इराणकडे पाठवलेला तांदूळ आणि अडकलेले कंटेनर. (exports)तांदळाच्या निर्यातीसाठी कोणताही विमा उपलब्ध नसल्याने, युद्धजन्य परिस्थितीत नुकसान भरून निघण्याची शक्यता नाही. यामुळे अनेक निर्यातदारांच्या कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडकली आहे. सध्या भारतातील विविध बंदरांवर सुमारे ४,००० कंटेनर अडकून पडले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : थायलंडमध्ये राजकीय खळबळ! काका आणि त्यांची खुर्ची धोक्यात, ‘17 मिनिटांच्या कॉल’मुळे पंतप्रधान अडचणीत

फक्त चार महिन्यांची परवानगी – निर्यात वेळेत झाली नाही तर परवाना रद्द
इराणला तांदळाच्या निर्यातीसाठी भारत सरकारकडून फक्त चार महिन्यांची परवानगी दिली जाते. या कालावधीतच माल पोहोचवणे बंधनकारक असते. युद्धामुळे जर तांदूळ वेळेत पोहोचला नाही, तर परवाना आपोआप रद्द होतो आणि निर्यातदाराला थेट आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

केंद्र सरकारकडे मुदतवाढीसाठी मागणी
तांदूळ निर्यातदारांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, इराण सरकारशी चर्चा करून परवानगीची मुदत वाढवण्यात यावी. त्यांचं म्हणणं आहे की ही आपत्कालीन परिस्थिती असून, व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा. भारताकडून होणाऱ्या बासमती तांदळाच्या निर्यातीपैकी ४०% हरियाणामधून, तर उर्वरित ६०% पंजाब, दिल्ली व उत्तर प्रदेशातून होते.

इराणकडे सर्वाधिक निर्यात, सौदी आणि इराक दुसऱ्या क्रमांकावर
तांदूळ निर्यातदार गौतम मिगलानी यांच्या म्हणण्यानुसार, भारतातून होणाऱ्या बासमती तांदळाच्या निर्यातीपैकी सुमारे ३०% तांदूळ इराणला जातो, जो भारताचा सर्वात मोठा ग्राहक आहे. यानंतर सौदी अरेबिया आणि इराक हे दोन देश भारतातून सर्वाधिक तांदूळ आयात करतात. यामुळे इराणमधील स्थितीचा परिणाम संपूर्ण बासमती उद्योगावर होतो.

भावी संकट – नवीन पीक खरेदीही धोक्यात
निर्यातदारांचा इशारा आहे की, जर तातडीने इराणला निर्यात पुन्हा सुरू झाली नाही, (exports)तर पुढील तांदूळ हंगामात त्यांना नवीन पीक खरेदी करणे शक्य होणार नाही. यामुळे पुढे देशांतर्गत दरातही मोठी घसरण होण्याचा धोका आहे आणि शेतकऱ्यांनाही याचा फटका बसू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराण-इस्रायल संघर्षात हुकूमशाहाची उडी! उत्तर कोरियाची तिखट प्रतिक्रिया, डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम संपला

भारताच्या कृषी निर्यातीच्या क्षेत्राला गंभीर फटका
इराण-इस्रायल युद्धाने भारताच्या कृषी निर्यातीच्या क्षेत्राला गंभीर फटका दिला आहे. बासमती तांदळाच्या प्रमुख ग्राहकांपैकी एक असलेल्या इराणकडे निर्यात ठप्प झाल्यामुळे निर्यातदार संकटात आले आहेत. केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने हस्तक्षेप करावा, हीच सध्या तांदूळ व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

हेही वाचा :