सध्या इन्स्टाग्रामवर गेलं तर की एक व्हायरल झालेला ट्रेंड समोर येतो.(inviting ) यामध्ये एका काचेच्या ग्लासमध्ये हळद टाकून त्या पाण्याचा रंग बदलला जातो. सध्या अनेकजण हा ट्रेंड फॉलो करतायत. सध्या सोशल मीडियावर एक विचित्र ट्रेंड जोरात व्हायरल झालाय. अनेक तरुण-तरुणी रात्रीच्या अंधारात पाण्यात हळद मिसळून यावर रील्स तयार करतायत. मात्र हा ट्रेंड आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय. प्रसिद्ध ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी या ट्रेंडवर गंभीर इशारा दिला आहे. असं करण्यामागे तांत्रिक क्रिया असल्याचा दावा त्यांनी केलाय.
या ट्रेंडमध्ये रात्रीच्या अंधारात पाण्यात हळद टाकण्याचे रील्स अनेकजण बनवतायत. अनेकांना यामागचा अर्थ माहित नसला तरी ‘व्हायरल कंटेंट’ म्हणून हे अनेक जण असं करतायत. पण ज्योतिषांच्या मते ही फक्त गंमत नाही, तर भविष्यातील संकटाना आपण निमंत्रण देतोय, असं म्हणणं आहे.(inviting )अरुण व्यास यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की, “पाण्यात हळद मिसळणं हे काही साधं काम नाही. ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते. इतकंच नाही तर ही क्रिया केली तर भूत-प्रेतांचं सावट घरावर येऊ शकतं.”
या विचित्र ट्रेंडचा ग्रहांवरही परिणाम होतो. व्यास यांच्या मते, या कृतीमुळे चंद्र आणि गुरु हे ग्रह दुर्बल होतात. यामुळे व्यक्तीच्या भाग्यावर आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. त्यांनी ही प्रक्रिया पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.ज्योतिष्य तज्ज्ञांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्स चिंतेत पडले आहेत. (inviting )काहींनी कमेंटमध्ये विचारलं, “मी असा व्हिडिओ बनवला आहे, आता काय करावं?”, तर काहींनी म्हटलं, “काही ज्योतिष तर पाण्यात हळद टाकून अंघोळ करण्याचा सल्ला देतात. मग ते बरोबर की चूक?” त्यामुळे या ट्रेंडवरून वाद निर्माण होत असल्याचं चित्र आहे.या ट्रेंडवर आता वाद सुरू झाला आहे. दरम्यान अशा ट्रेंड्समध्ये सहभागी होण्याआधी योग्य माहिती घेणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा :