हुंड्याच्या बळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेने आपल्या चिमुकल्या बाळाला पोरकं करून जगाचा निरोप घेतला.(dowry) पण तिच्या या टोकाच्या निर्णयाने समाजात दबलेल्या अनेक प्रश्नांना पुन्हा तोंड फुटलं आहे. वैष्णवीच्या सासरच्यांची कसून चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणात रोज नवे धागेदोरे समोर येत आहेत. याच संदर्भात, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री अंकिता वालावलकर हिने एक व्हिडिओ शेअर करत तिच्या आयुष्यातील काही भयानक आणि धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. तिच्या या खुलाशाने सर्वांनाच विचार करायला लावलं आहे.
अंकिताने तिच्या नव्या ब्लॉगमध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणावर बोलताना सांगितलं की, काहींना वाटलं वैष्णवीची चूक होती, काहींना तिच्या आई-वडिलांची चूक वाटली, तर काही जणांनी सासरच्या मंडळींना दोषी ठरवलं. धक्कादायक म्हणजे, काही लोक तर आता वैष्णवीच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवत आहेत. पण यावेळी अंकिताने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, “तुम्ही कधी विचार केला आहे का, त्या मुलीला तेव्हा काय वाटलं असेल? जीव देण्यासाठीही खूप हिंमत लागते… मला विचारा! (dowry)जर त्या मुलीमध्ये इतकी हिंमत असेल, तर ती नक्कीच चारही बाजूंनी कोंडीत सापडलेली होती. मुलींच्या बाबतीत असं काही घडल्यास मला खूप राग येतो, कारण मी स्वतःही या परिस्थितीतून गेले आहे.”
अंकिताने तिच्या आयुष्यातील एका गंभीर आणि धक्कादायक सत्याचा खुलासा करत सांगितले की, वैष्णवीने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण तिला कोणीही गंभीरपणे घेतलं नाही. उलट, ती फक्त आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं किंवा काहीच करू शकत नाही असं दाखवल्यामुळेच ती या टोकाच्या पावलापर्यंत पोहोचली. अंकिताने तिच्या स्वतःच्या अनुभवाचा दाखला देत समाजाला आरसा दाखवला. “एखादी मुलगी श्रीमंत मुलाशी लग्न करते, तेव्हा ‘तिने श्रीमंती बघून लग्न केलं’ असे टोमणे मारले जातात. मुलीचा आवाज दाबला जातो. मी जेव्हा स्वतः माझ्याबद्दल लोकांना सांगितलं, तेव्हा मला कमेंट सेक्शनमध्ये खूप ट्रोल केलं गेलं. एका मोठ्या शोमध्ये मी माझ्याबद्दल बोलले, तेव्हाही तसंच घडलं. पण मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी त्या गोष्टींना फाट्यावर मारून पुढे आले आहे, म्हणूनच आज माझं भलं झालं आहे.”
“माझ्यावर अशी वेळ आली, तेव्हा समाजाने मला जी वागणूक दिली, ती तुम्ही पाहिली आहे का? हे सर्व सहन करण्याची प्रत्येकाची कुवत नसते; देवाने मला नशिबाने ती शक्ती दिली. म्हणूनच मी हे सगळं पार करू शकले, नाहीतर या वैष्णवी हगवणेच्या जागी कदाचित एखादी अंकिता दिसली असती, जिने आपला जीव दिला असता,”(dowry) असं म्हणत अंकिताने समाजातील दुहेरी भूमिकेवर बोट ठेवलं. “या सगळ्याला कारणीभूत आपला समाजच असतो, जो प्रत्येक वेळी त्या मुलीला, तिच्या कपड्यांना आणि तिच्या कुटुंबाला दोष देत असतो.”
अंकिता वालावलकर पुढे म्हणाली की, बऱ्याच जणांनी असंही म्हटलं की, वैष्णवीला तिच्या आई-वडिलांनी पुन्हा सासरच्या घरी का पाठवलं? चूक त्यांच्या आई-वडिलांचीच आहे. याबाबत तिने तिच्या स्वतःच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. “एकदा एक काका आमच्या घरी आले होते आणि ते म्हणाले की, ‘आजकाल तुमची मुलगी इथेच असते!’ तेव्हा माझी आई वाघिणीसारखी त्या माणसावर बरसली, ‘तुम्हाला जड झाली आहे का मुलगी? मला माझी मुलगी जड झालेली नाही. मी माझ्या मुलीचं भविष्य पाहू शकते. तुम्ही काळजी करू नका.'”
हेही वाचा :