दुर्घटनेच्या 5 दिवसांनी एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानातच मोठा बिघाड, ऐनवेळी मोठा निर्णय

अहमदाबाद : एअर इंडियाचे AI-171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले असताना भीषण अपघात झाला. टेकऑफच्या काही सेकंदात विमान मेडिकल हॉस्टेलवर कोसळले आणि 270 लोकांचा मृत्यू झाला. विमानातील(flight ) फक्त एकच प्रवासी या दुर्घटनेत वाचला. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. हे प्रकरण ताजे असतानाच आता अजून एक धक्कादायक बातमी पुढे येताना दिसतंय.

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान(flight )आता तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाश्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. एअर इंडियाचे विमान AI-159 लंडनला जात असताना तपासणीत बिघाड आढळल्याने रद्द करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान अपघातानंतर एअर इंडियाचे विमान AI 159 लंडनला रवाना होणार होते. मात्र, त्यापूर्वीच तपासणीत तांत्रिक बिघाड आढळल्याने विमान रद्द करण्यात आले. हे विमान लंडनला परत कधी जाणार, याबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, टेकऑफ करण्यासाठी काही वेळ शिल्लक असतानाच हे विमान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे विमान अहमदाबाद विमानतळावरून(flight ) आज दुपारी 1:10 वाजता टेकऑफ करणार होते. सकाळपासूनच फ्लाईटला उशीर होत होता. आता तर थेट तांत्रिक बिघाडाचे कारण सांगून विमान रद्द करण्यात आले. प्रवाश्यांना याबद्दलची माहिती एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. पाच दिवसांपूर्वीच अहमदाबाहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला. हा अपघात किती जास्त भंयकर होता, हे व्हायरल व्हिडीओवरून स्पष्ट होतंय.

या अपघातात फक्त रमेश विश्वास कुमार हे जिवंत सापडले आहेत. त्यांनी अपघातावेळी विमानातून उडी घेतल्याचेही सांगितले. रमेश यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, माझ्या डोळ्यासमोर अनेकांचे जीव गेले. थोडी जागा शिल्लक असल्याने मी अपघातग्रस्त विमानातून बाहेर येऊ शकलो. विमानातील 241 लोकांचा मृत्यू झाला. यासोबतच हॉस्टेलवर विमान कोसळल्याने काही मेडिकलच्या विद्यार्थ्यांचाही जीव गेला. त्यानंतर अपघाताच्या पाचव्याच दिवशी एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले.

हेही वाचा :