राज्यभरात वीजपुरवठा करणारी महावितरण कंपनी आता मुंबईकरांसाठी मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे.(announcement) महावितरणने मुंबई शहरात वीज वितरणाचा परवाना मिळावा यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अधिकृत याचिका दाखल केली आहे. सध्या महावितरण भांडूप आणि मुलुंड या भागात वीजपुरवठा करत आहे, मात्र आता मुंबईतील इतरही प्रमुख भागांमध्ये विस्तार करण्याची तयारी सुरू झाली आहे.या नव्या प्रस्तावानुसार कुलाबा ते माहीम, वांद्रे ते दहीसर पश्चिम उपनगर, विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखुर्द (पूर्व उपनगर), तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात वीजपुरवठा करण्यासाठी परवाना मागण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना स्वस्तात वीज मिळण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
सध्या मुंबईमध्ये बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या तीन कंपन्यांकडून वीजपुरवठा होतो. (announcement) यामध्ये बेस्टचा कार्यक्षेत्र मुख्यत्वे मुंबई शहरात असून, टाटा पॉवर आणि अदानी कंपनी पूर्व-पश्चिम उपनगरात सेवा पुरवतात. महावितरण फक्त मुलुंड आणि भांडूपमध्ये कार्यरत आहे. मात्र, आता महावितरणने शहरभर सेवा देण्यासाठी अधिकृत परवाना मागितल्यामुळे ती चौथी पर्याय ठरणार आहे.महावितरणकडे सध्या 3 कोटी 17 लाख वीज ग्राहक आहेत. तसेच 4230 उपकेंद्रे, 25 हजार उच्च दाब फीडर्स, 9.6 लाख वितरण ट्रान्सफॉर्मर्स आणि एकूण 4 लाख किलोमीटरहून अधिक लांबीच्या वीजवाहिन्यांचे जाळे आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे.
मुंबईची सरासरी वीज गरज दररोज 4 हजार मेगावॅट आहे. महावितरण सध्या 26 हजार मेगावॅट वीजपुरवठा करते. येत्या पाच वर्षांत ही क्षमता 81 हजार मेगावॅटपर्यंत नेण्याचे नियोजन असून, त्यासाठी विविध करार केले गेले आहेत. यामध्ये सौर व पवन ऊर्जेसारख्या हरित ऊर्जेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे महावितरणकडून वीज दर कपात करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.(announcement) मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प – जसे की कोस्टल रोड, मेट्रो मार्गिका आणि नवीन निवासी व व्यावसायिक प्रकल्प – यामुळे वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने आपली भूमिका अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :