मुंबईतही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, मुंबईतील ठाकरे गटाचे(political updates) दोन प्रमुख शिलेदार माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखाप्रमुख संजय जंगम शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. विशेष बाब म्हणजे, हे दोन्ही नेते काल मातोश्री येथे पार पडलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते.
त्यामुळे बैठक संपल्यानंतर लगेचच त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच शिंदे गटाने ठाकरेंना मोठा राजकीय धक्का दिला आहे. आता यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी खळबळजनक आरोप केलाय.
विनायक राऊत(political updates) म्हणाले की, 22 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले की, आम्हाला कशाप्रकारे आमिष दाखवली जात आहेत. कशाप्रकारे आम्हाला शिंदे गटात बोलावलं जात आहे. बाजारात काही शिंदेंचे दलाल गिर्हाईक शोधत फिरत आहेत. दुसऱ्याकडून माल विकत घ्यायचा आणि स्वतःचा पक्ष चालवायचा, असे काम सुरु आहे. त्यांनी आधीच ठरवलं असणार पण उद्धव ठाकरे काय बोलतात यासाठी ते बैठकीला आले असतील. आम्हाला चुणूक होती की ते घेणे जाणार आहेत, असे त्यांनी म्हटले.
विनायक राऊत पुढे म्हणाले की, शिंदे गटाचे काही दलाल आहेत. त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याचा एक अधिकारी आहे. निमेश रेवडेकर असे त्याचे नाव आहे. हा बऱ्याच नगरसेवकांच्या घरी जातो. त्यांच्या घरच्या मंडळींना फोन करतो. तुमच्या आयुष्याचं साहेब भलं करणार आहेत, असे सांगतो, असा आरोप त्यांनी केला. तर शिंदे हे नपुंसक राजकारणी आहेत. त्यांना स्वतःच्या पक्षातला स्वतःचा कार्यकर्ता निर्माण करण्याची हिंमत नाही, असा हल्लाबोल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
विकत घेतलेल्या लोकांच्या जीवावर पक्ष चालवता येत नाही. सगळ्या माजी नगरसेवकांशी संवाद साधण्याचे काम उद्धव ठाकरे करतात. करोडो रुपयांचे आमिष उद्धव ठाकरे देऊ शकत नाहीत. आमचे दलाल बाजारात फिरत नाहीत. एक माजी नगरसेवक, एक विभाग प्रमुख आज जात आहे. आजचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेला आहे. शिंदे गटाच्या तुडतुड्यांचा नाटक आज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :