माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. शिवसेना मनसे युती होणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या रंगली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबात सकारात्मक चर्चा देखील सुरु आहेत.अशातच शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजीत मेळाव्यता बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी मनसे शिवसेना युतीबाबत एक सूचक वक्तव्य केले. काय होणार की नाही ते कळेल… जे राज्याच्या मनात आहे ते मी करेन असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीबाबत सकारात्मक विधान केले आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होऊ नये यासाठी मालकाचे नोकर गाठीभेटी घेतायत. मुंबईचा ताबा आम्ही घेणारच आहोत असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे अजूनही सकारात्मक आहे. जनतेच्या मनात आहे तेच करणार असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात एक मोठं विधान केलंय. मराठी माणसांची शक्ती एकत्र येत असल्यामुळे त्यांच्याकडून भेटीगाठी सुरू आहेत. तसंच ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसंदर्भात सकारात्मक वक्तव्य येताहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असी अटकळ बांधली जात आहे. नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय.. मनसेसोबत युती करायची की नाही असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या बैठकीत माजी नगरसेवकांना विचारला. यावेळी युती केली तर फायदा होईल, कारण मुंबईत युतीसंदर्भात अनुकूल वातावरण आहे अशी माहिती माजी नगरसेवकांनी ठाकरेंना दिली.
युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीआधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षांतील नेतेही सकारात्मक असल्याचा पाहायला मिळतंय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर आता ठाकरेंच्या शिवसेनेत्या नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रीया दिली.
दरम्यान, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरे गटाची युती भाजपचे वरिष्ठ नेते होऊ देणार नाहीत असं ठाकरे गटाच्या काही नेत्यांना वाटतं असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. 100 टक्के महापालिका आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती आहे. विशेषतः यांत भाजप आक्रमक दिसून येत आहे.
हेही वाचा :