देशात इंधन तुटवडा आणि संभाव्य लॉकडाऊनबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान केंद्र सरकारने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून नागरिकांच्या चिंतेला उत्तर देताना स्पष्ट केलं की, देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही आणि पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे.

मध्यपूर्वेतील तणाव आणि विशेषतः Iran संदर्भातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने (lockdown) अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवरही भारतात इंधन पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं पुरी यांनी सांगितलं. ऊर्जा, पुरवठा साखळी आणि आवश्यक वस्तूंची उपलब्धता अबाधित राहावी यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.

लॉकडाऊनबाबत सुरू असलेल्या अफवांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. (lockdown) अशा संवेदनशील परिस्थितीत अफवा पसरवणं टाळण्याचं आवाहन करत नागरिकांनी शांत आणि जबाबदारीने वागावं, असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली असून त्या 70 डॉलर प्रति बॅरलवरून 122 डॉलरपर्यंत पोहोचल्या आहेत. याचा परिणाम अनेक देशांमध्ये दिसून येत असून दक्षिण-पूर्व आशियात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली आहे, तर आफ्रिकेत सुमारे 50 टक्के वाढ झाली आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपमध्येही 20 ते 30 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

या जागतिक दबावाच्या पार्श्वभूमीवरही भारतात नागरिकांवर अतिरिक्त भार पडू नये यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोलवर प्रति लिटर 10 रुपयांची सूट दिली आहे. (lockdown) त्यामुळे पेट्रोलवरील एक्साइज ड्युटी 13 रुपयांवरून 3 रुपयांवर आली असून डिझेलवरील शुल्क शून्य करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला असला तरी ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही वाचा :

रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून

सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *