दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाची तारीख ठरली?

संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाकडून दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. आता या परीक्षांचे निकाल(results) मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केले जाणार आहेत. या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा असते. आता दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख समोर आली आहे. या परीक्षांचा निकाल 15 मेपूर्वी जाहीर करण्याचा मंडळाचा प्रयत्न जात आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी लक्षात घेत राज्य मंडळातर्फे दोन्ही परीक्षा लवकर घेण्यात आल्या. आता परीक्षांचे निकालदेखील (results)लवकर जाहीर करण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतली आहे. पुरवणी परीक्षाही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला होता. ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी नियुक्त केले गेले नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. राज्य मंडळाकडून दोन्ही परीक्षांचे निकाल १५ मेपूर्वी जाहीर करण्यावर भर दिला जात आहे. त्यादृष्टीने मंडळाची तयारी सुरू आहे, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून मे महिन्याच्या अखेरीस निकाल प्रसिद्ध होत आहे. मात्र, यंदा दोन्ही परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस आधीच सुरू झाल्याने निकाल जाहीर होण्यास जास्त वेळ लागणार नाही, असेही आता म्हटले जात आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात काकडीचा रायता खाताय? तर ‘ही’ बातमी वाचाच
आज व्यवसायात सर्व बाजूंनी होणार धनलाभ, अपूर्ण कामंही होणार पूर्ण
कडाक्याच्या ऊन्हात एसी बंद पडला दुरूस्तीसाठी जाताच हातात आली सापांची पिल्ले video viral