वजन कमी करताना ‘या’ 3 फळांपासून सावधान! आरोग्याची हानी होण्याची शक्यता

आजकालच्या काळात जीवनशैली बदलत चाललीय. कामाचा ताण, जंकफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव यासारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. त्यापैकीच एक म्हणजे लठ्ठपणा.. वजन कमी करण्यासाठी लोक त्यांच्या आहारात(health) अनेक प्रकारची फळे आणि पदार्थांचा समावेश करतात.

अशावेळी, आपल्या आहारात आरोग्यदायी(health) गोष्टी असणे खूप महत्वाचे आहे, कारण सर्वच फळे आणि पदार्थ वजन कमी करण्यासाठी इतके फायदेशीर नसतात, तर काही फळे आपल्या आहाराचा निरोगी भाग असू शकतात. त्याच वेळी, वजन कमी करताना काही फळे तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतात.
अनेक वेळा लोक त्यांच्या वजन कमी करण्याच्या आहारात फळांचा समावेश करतात. कारण त्यात फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातील कॅलरीज कमी करण्यास मदत करतात. जाणून घेऊया वजन कमी करण्याच्या आहारात कोणती फळे आणि पदार्थ समाविष्ट करू नयेत?
वेट लॉस करताय? ‘हे’ पदार्थ खाणे टाळावे…
आहारतज्ज्ञ सांगतात, तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात पापड कधीही समाविष्ट करू नये, कारण त्यात सोडियम आणि अतिरिक्त कॅलरीज असतात. तसेच अल्कोहोल पिणे बंद करा, कारण त्यात भरपूर कॅलरीज देखील असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. याशिवाय मिठाई, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्सचे सेवन बंद करावे.
अननस – रक्तातील साखर वाढवू शकते
आहारतज्ज्ञ सांगतात,अननसमध्ये असलेली नैसर्गिक साखर कधीकधी रक्तातील साखर वाढवू शकते, ज्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या वजनाच्या आहारात अननसाचा समावेश करू नका हे लक्षात ठेवावे.

चेरी – अन्नाची लालसा वाढू शकते
आहारतज्ज्ञ सांगतात, चेरीमध्ये चरबी कमी आणि फायबर जास्त असते, परंतु त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर फळांपेक्षा जास्त असतो. याचे सेवन केल्याने तुमची रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि यामुळे तुमची अन्नाची लालसा वाढू शकते. यामुळे तुम्ही अनेकदा जास्त अन्न खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका वाढतो.
द्राक्ष – वजन वाढण्याचा धोका
आहारतज्ज्ञ सांगतात, फक्त एक कप द्राक्षांमध्ये सुमारे 100 ग्रॅम कॅलरीज असतात आणि त्यात नैसर्गिक साखर भरपूर असते. अनेक वेळा द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि वजन वाढण्याचा धोका असतो.
हेही वाचा :
तिजोरीसंबंधी महत्त्वाचे वास्तु नियम; जाणून घ्या संपूर्ण माहिती
कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज? ऐतिहासिक चित्रं पाहाच
भर कार्यक्रमात अर्जुन कपूरनं केलं मलायका अरोराचं तोंड बंद उत्तर देत अभिनेत्री म्हणाली पुढे हो