दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या मुख्यमंत्री(Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांची निवड अवैध ठरवून आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर गुडधे यांच्या वतीने लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला असून, त्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखूव ठेवला आहे. या निर्णयाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या याचिकेवर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद सादर करण्यात आले आहेत. यामध्ये फडणवीस यांनी याचिकेला जोरदार विरोध दर्शवला आहे(Chief Minister)). निवडणूक याचिका दाखल करताना खुद्द उमेदवाराची उपस्थिती आवश्यक असते. मात्र, याचिकाकर्ते गुडधे स्वतः गैरहजर होते, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी, असा युक्तिवाद फडणवीस यांचे वरिष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांनी यापूर्वीच्या सुनावणीत केला होता. सध्या या याचिकेवरील निकाल न्यायालयाने राखीव ठेवला असून, त्याकडे राज्याच्या राजकारणात उत्सुकतेने पाहिले जात आहे.
त्यानंतर न्यायालयाने गुडधे यांना लेखी युक्तिवाद सादर करण्याची संधी दिली होती. या अनुषंगाने सोमवारी न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. यावेळी गुडधे यांच्यातर्फे वरिष्ठ विधिज्ञ मेहमूद प्राचा यांनी युक्तिवाद सादर केला. गुडधे यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहून ही याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेवरील स्वाक्षऱ्या संबंधित लिपिक आणि नोंदणी अधिकाऱ्यांसमोर केल्या होत्या. मात्र, त्याच दिवशी सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.
५ जानेवारी २०२५ रोजी रविवार होता, तर त्यानंतर ६ जानेवारीला गुडधे काँग्रेस पक्षाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. त्यामुळे त्या दिवशी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया त्यांच्या वकिलांनी पूर्ण केली, असे युक्तिवादात नमूद करण्यात आले. या युक्तिवादात ॲड. मेहमूद प्राचा यांना ॲड. आकाश मून आणि ॲड. पवन डहाट यांचे सहकार्य लाभले.
याशिवाय, दक्षिण नागपूरमधून विजयी झालेल्या गिरीश पांडव यांच्याविरुद्ध, चिमूर (चंद्रपूर) येथून निवडून आलेल्या भांगडिया यांच्याविरुद्ध सतीश वारजूरकर, बल्लारपूरमधून विजयी झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध संतोषसिंग रावत आणि राजुरा मतदारसंघातून निवडून आलेल्या भोंगळे यांच्याविरुद्ध सुभाष धोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकाही समान निकषावर फेटाळाव्यात, अशी मागणी युक्तिवादादरम्यान करण्यात आली. दरम्यान, या सर्व याचिकांवरील निकाल न्यायालयाने सध्या राखून ठेवला आहे.
हेही वाचा :