काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याची सोडचिठ्ठी

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. (letter )अनेक नेते आपल्या राजकीय सोईनुसार पक्षबदल करत आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, ठाकरेंची शिवसेना तसेच काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षात प्रवेश केला आहे. असे असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सानंदा यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही निश्चित झाली आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशावेळी त्यांचे हजारो कार्यकर्तेही अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 12 जून रोजी सानंदा यांचा अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार आहे. त्यांच्या या प्रवेश सोहळ्याला अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.(letter ) सानंदा यांच्या सांगण्यानुसार या सोहळ्यात त्यांचे एकूण 25 हजार कार्यकर्तेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

त्यांच्या या पक्षप्रवेशावर खुद्द सानंदा यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्ष सोडला असला तरी माझी तीच विचारसरणी आहे. ज्या कार्यकर्त्यांनी मला 40 वर्ष साथ दिली, त्यांना मला सत्तेत बसवायचे आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीत गेलो तर ती ध्येय पूर्ण होईल, असा विश्वास आहे, अशी भावना सानंदा यांनी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी अजित पवार यांचीदेखील वाहवा केली.

काँग्रेस पक्ष सोडत असलो तरीदेखील माझी काहीही नाराजी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (letter )काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माझे चांगले मित्र आहेत, असं म्हणत त्यांनी माझं काँग्रेस पक्षाशी अजूनही काहीही बिनसलेलं नाही, असे अप्रत्यक्षपणे सांगितलं. तसेच माझ्या प्रक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे सर्व 9 मंत्री उपस्थित असतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून आणखी एक माहिती समोर येत आहेत. उद्धव ठाकरे यांचे पाच खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत असं सूत्रांकडून कळत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी याबाबत ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून या खासदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा :