आज मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने (Heavy rain)जोरदार हजेरी लावली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ७ जुलै २०२५ रोजी राज्यातील ९ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील काही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, डोंगराळ भागात आणि घाटमाथ्यांवर अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान खात्याचे भाकीत आहे. पावसाचा हा जोर १० जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट :
हवामान खात्याने ज्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यात रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची(Heavy rain) शक्यता असून, मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये दरड कोसळण्याचा किंवा पाणी साचण्याचा धोका असल्याने स्थानिक प्रशासन सज्ज राहिले आहे. अनेक ठिकाणी शाळांना स्थानिक पातळीवर सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय होऊ शकतो.

पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी :
पालघरमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे(Heavy rain) जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जुलै रोजी सर्व प्रकारच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये सरकारी, खासगी, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित तसेच आश्रमशाळा यांचा समावेश आहे. अंगणवाड्यांनाही सुट्टीचा आदेश देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली असून, पालकांनी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये हवामानावर आधारित निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुढील चार दिवसांचं हवामान :
७ ते १० जुलै दरम्यान कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. विशेषतः कोकणात किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून, अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्याच्या भागात दरडी कोसळण्याचा धोका आहे.

विदर्भात देखील मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मराठवाड्यातील काही भागांत विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी? :
हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, पाण्याने भरलेल्या ठिकाणी न जाण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवण्यात आले असून, आवश्यकतेनुसार मदतीसाठी तत्पर राहणार आहेत.

शाळा बंद असल्या तरी पालकांनी मुलांना घरातच राहण्याचा सल्ला द्यावा, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचना वेळोवेळी ऐकून वागावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा :