तिजोरीसंबंधी महत्त्वाचे वास्तु नियम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

तिजोरीचे स्थान आणि त्याभोवतीची व्यवस्था आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाची आहे.(vastu)जर तुम्हाला वास्तुदोष टाळायचा असेल, तर तिजोरी अंधाऱ्या ठिकाणी कधीही ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, अंधारामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि धन प्रवाहात अडथळे येतात. तिजोरी उत्तरेकडे ठेवणे शुभ मानले जाते, कारण यामुळे संपत्ती वाढते आणि आर्थिक स्थिती भक्कम राहते.

1) बाथरूमजवळ तिजोरी ठेवू नका
बाथरूम किंवा टॉयलेटजवळ तिजोरी ठेवणे टाळावे, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि व्यवसाय-नोकरीत अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत आर्थिक नुकसान होऊ शकते. स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जेच्या ठिकाणी तिजोरी ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा राहते.
2) उपहारात मिळालेल्या वस्तू तिजोरीत ठेऊ नका
जर तुम्हाला दागिने, घड्याळ किंवा कोणतेही वस्त्र उपहारात .(vastu)मिळाले असेल, तर ते तिजोरीत ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, अशा वस्तू धनाच्या वाढीस अडथळा आणतात आणि बचतीला बाधा येते. उपहारात मिळालेल्या वस्तू वेगळ्या जागी ठेवा आणि तिजोरीत फक्त संपत्ती व शुभ वस्तू ठेवा.
3) तिजोरी स्वच्छ ठेवा
तिजोरी आणि तिजोरीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुटलेली भांडी, जुनी पुस्तकं किंवा खराब झालेल्या वस्तू तिजोरीजवळ ठेऊ नयेत, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. तिजोरीच्या दरवाज्यावर स्वस्तिक किंवा श्री यंत्र लावल्यास धनवृद्धी होते आणि देवी लक्ष्मीची कृपा लाभते.
वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय शास्त्र असून, वास्तूची रचना आणि परिसर यांच्यात संतुलन साधण्यासाठी मार्गदर्शन करते. वास्तुशास्त्राचे पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, ज्यामुळे मनःशांती, आरोग्य, आनंद आणि समृद्धी मिळते. पंचतत्त्वांचे संतुलन राखून वास्तु रचना केल्यास नैसर्गिक आपत्ती, तणाव आणि आर्थिक अडचणी टाळता येतात. व्यवसायात भरभराट, कुटुंबात सुसंवाद आणि आरोग्य टिकवण्यासाठी.(vastu) वास्तुशास्त्र महत्त्वाचे मानले जाते. भारतीय संस्कृतीत याचे अनन्यसाधारण महत्त्व असून, आजही अनेकजण वास्तुशास्त्रानुसार वास्तू बांधून सुख-समृद्धी अनुभवतात. वास्तुशास्त्र हे जीवन समृद्ध करण्याचे विज्ञान आहे.
हेही वाचा :
‘फक्त दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा’… ; संजय राऊत यांचा घणाघात
रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर: 50 दिवसांसाठी मोफत इंटरनेट त्यासोबत…
चिकन खाणाऱ्यांनो सावधान! डॉक्टरांनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती