भारत चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्याची शक्यता
पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे(champions trophy) आयोजन करण्यात येणार आहे. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे आणि त्यांनी त्रयस्थ ठिकाणी सामन्यांचे आयोजन करण्याची भूमिका घेतली आहे.
भारतीय संघाच्या या भूमिकेवर अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (champions trophy) किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. जर भारताच्या मागणीवर निर्णय न झाल्यास टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्याचा पर्याय विचारात घेऊ शकते.
PCB ने चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रस्तावित वेळापत्रक ICC ला सादर केले असून भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
BCCI च्या मागणीवर PCB ने मान्यता दिली नाही तर भारतीय संघ स्पर्धेतून माघार घेऊ शकतो. जर भारताने माघार घेतली तर चॅम्पियन्स ट्रॉफीत 7 संघ राहतील. भारताच्या माघारीमुळे श्रीलंकेला स्पर्धेत स्थान मिळू शकते, कारण गेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका नवव्या स्थानावर होती.
BCCI चे सचिव जय शाह यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भारत चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारताच्या या निर्णयाकडे क्रिकेट जगतातील सर्वांचे लक्ष लागले आहे आणि BCCI च्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा केली जात आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांजवळ एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी, काय आहे सरकारचा प्लान?
‘भारतीय जेवण हे घाणेरडं’; अंबानींच्या लग्नासाठी भारतात आलेल्या किम कर्दाशियनचा ‘तो’ VIDEO VIRAL
अजित पवार तडकाफडकी दिल्लीला, काहीतरी मोठं घडणार; आमदारांची धाकधूक वाढली