Kolhapur :अन् घरी जाताना अचानक पावसाने जोर धरला, ती वेळच काळ ठरली जी शाळकरी मुलाच्या जीवावर बेतली

काल गुरुवारी १२ जून सायंकाळी पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने कोल्हापूर शहराला अक्षरशः झोडपलं आहे.(suddenly )सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल दीड तास पडलेल्या पावसामुळे अनेक नाले,ओढे ओसंडून वाहत होते. काल झालेल्या या पावसामध्ये सरनोबतवाडी येथे शाळकरी मुलगा घरी जाताना सायकलने ओढा ओलांडत होता. मात्र पाण्याला प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बचाव पथकाने रात्री उशीरापर्यंत शोध मोहीम घेतली. मात्र मुलगा मिळाला नाही. अखेर आज १३ जून सकाळी नाल्यात दाट झाडीत मुलाचा मृतदेह मिळून आला.

कोल्हापुरातील उजळाईवाडी येथील धोंडेनगरमध्ये राहणारा अमान जमानुल्ला भालदार वय वर्ष ११ हा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहावीत शिकत होता. काल सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अमान हा शिकवणीसाठी उजळाईवाडीतून सरनोबतवाडीच्या दिशेने सायकलवरून निघाला होता. यावेळी उत्तरेकडे वाहणाऱ्या ओढ्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत होते.यावेळी अमानला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो सायकलसह ओढ्यात उतरला. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याचा तोल गेल्याने तो वाहून गेला.(suddenly ) यावेळी परिसरातील वीट कारखान्याचे मालक विजय आडवे आणि त्यांच्या कामगारांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. अमान ओढ्यातील एका बेटाला धरून उभा होता. मात्र, जॅकेटमध्ये पाणी भरल्याने ते त्याच्या चेहऱ्याभोवती गुंडाळले गेले आणि त्याच ओढ्याच्या प्रवाहात तो वाहून गेला.

घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ शोधकार्य सुरू केले. मात्र ओढ्याच्या काठावर दाट झाडी, चिखल, अंधार आणि पाण्याचा वेग यामुळे शोध मोहिमेत अडचणी आल्या. (suddenly )रात्री उशिरा शोधमोहीम थांबवण्यात आली. सकाळी पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या के डी आर एफ पथकाने शोधमोहीम सुरू केली आणि अमान एका घनदाट झाडीत मिळून आला. नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्याला जवानांनी बाहेर काढलं आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवून देण्यात आले. मात्र या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

हेही वाचा :