हातावर मेहंदी अन् गळ्यात ओढणी; कॉंग्रेस नेत्या यांचा सूटकेसमध्ये आढळला मृतदेह

नवी दिल्ली : काँग्रेस(Congress) महिला नेत्या हिमानी नरवाल यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार हरियाणातल्या रोहतकमध्ये घटना असून यामुळे हरियाणासह देशभरामध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रोहतकमधील सांपला बस स्टँडजवळ एका सुटकेसमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. राज्यात निवडणुका होत असताना ही घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

हरियाणातल्या रोहतक या ठिकाणी शनिवारी सकाळी 11 च्या दरम्यान बस स्थानकावर लोकांची गर्दी जमा झाली होती. त्यावेळी अचानक एकाजागी सुटकेस पडलेली असल्याचे दिसून आले. या निळ्या रंगाच्या सुटकेसकडे प्रवाशांचे लक्ष गेले. ही सुटकेस रस्त्याच्या कडेला अशीच ठेवण्यात आली होती. बेवारस बॅग ठेवली असल्यामुळे लोकांना संशय आला. लोकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

दरम्यान पोलीस आले आणि त्यांनी ही सूटकेस उघडली तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. या सूटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. हातावर मेहंदी, गळ्यात काळ्या रंगाची ओढणी, पांढरा टॉप आणि लाल रंगाची पँट. या युवतीचा मृतदेह पाहून असं वाटत होतं की गळा दाबून तिला ठार करण्यात आलं आहे त्यानंतर मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून फेकला आहे. पोलिसांनी तातडीने या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाला बोलवलं. शनिवारी दुपारपर्यंत ही तरुणीची ओळख पटली नव्हती. मात्र नंतर हा मृतदेह काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा असल्याची माहिती समोर आली.

कॉंग्रेसने(Congress) या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. कॉंग्रेसने ऑफिशियल अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. यामध्ये लिहिले आहे की, हरियाणातील रोहतक येथे काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या निर्घृण हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला शांती द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी. या कठीण काळात आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत आहोत. हिमानीसोबत घडलेल्या या क्रूर आणि लज्जास्पद घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.

बी.बी. बत्रा यांनी हिमानी नरवाल हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी अशी मागणी केली आहे. तसंच हरियाणातील कायदा आणि सुव्यवस्था संपल्यात जमा आहे असाही आरोप केला आहे. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची भीती आणि धाक उरलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत, असा आरोप देखील बी.बी. बत्रा यांनी केला आहे.

हेही वाचा :

जंगली मधमाशांनी केला सिंहावर हल्ला, संपूर्ण शरीराला चिपकून राहिल्या अन्.. Video Viral

महाराष्ट्रात महिला असुरक्षित… केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत टवाळखोरांची छेडछाड

पत्नीसोबत मिळून घरीच चालवायचा ‘तो’ देहव्यापाराचा धंदा; बडतर्फ पोलिसाचे घृणास्पद कृत्य