शिवजयंतीच्या पोस्टमध्ये राहुल गांधींकडून घोडचूक थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती असून राज्यभरामध्ये मोठ्या (no hard feelings)उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रीय नेत्यांनाही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच लोकसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे आमदार राहुल गांधींनीही आपआपल्या एक्स आधीचं ट्विटर अकाऊंटवरुन शिवजयंतीसंदर्भात पोस्ट केली आहे. मात्र राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये वापरलेल्या एका शब्दावरुन अनेकांनी आक्षेप घेतल्याचं त्यांच्या पोस्ट खाली पाहायला मिळत आहे.

राहुल गांधींनी आपला एक जुना फोटो पोस्ट करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. या फोटोमध्ये राहुल गांधी शिवरायांची पूर्णकृती मूर्ती हातात धरुन उंचावून दाखवताना दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करताना राहुल गांधींनी, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपलं शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भिडपणा आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची (no hard feelings)प्रेरणा दिली. त्यांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे,” अशी कॅप्शन दिली आहे.
मात्र शिवरायांच्या जन्मदिनी त्यांना ‘श्रद्धांजली अर्पण करतो’ असा उल्लेख या पोस्टमध्ये असल्याने अनेकांनी आक्षेप घेतला आहे. सामान्यपणे जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये आदरांजली असा उल्लेख करतात. श्रद्धांजली हा शब्द पुण्यतिथीच्या संदर्भातून वापरला जातो. असं असताना राहुल गांधींनी जयंतीच्या दिवशी हा शब्द पोस्टमध्ये वापरल्यावरुन आक्षेप घेतला जातोय. तशा कमेंट या पोस्टखाली पाहायला मिळत आहेत.

राहुल गांधींच्या पोस्टवरुन भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकरांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. राहुल गांधींनी हे ट्विट डिलीट करावं. असं केलं नाही तर(no hard feelings) कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असं भातखळकरांनी म्हटलं आहे. जन्मदिनाच्या दिवशी आदरांजली वाहतात, असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवजयंतीनिमित्त केली आहे. “शिवरायांच्या शौर्याने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याचा पाया घातला आणि अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्यासाठी प्रेरणा दिली. एक मजबूत, स्वावलंबी आणि समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी ते आपल्याला प्रेरणा देतात,” असं पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बनतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर!
जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंड हवी’; प्रसिद्ध अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य