महाराष्ट्रात महिला असुरक्षित… केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत टवाळखोरांची छेडछाड

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील ‘शिवशाही’ बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न चर्चेत आलेला असतानाच जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री(Minister) रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्र्याची मुलगीच सुरक्षित नसेल तर इतरांचं काय असा सवाल या प्रकरणानंतर उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय मंत्री(Minister) रक्षा खडसे यांच्या मुलीबरोबरच इतर मुलींची टवळखोर मुलांकडून यात्रेत छेड काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार समजल्यानंतर केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे या स्वत: मुली आणि महिलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. त्यांनी दोषींवर कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं.
एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांनी मोठा जमाव गोळा झाला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आमच्यासारख्या परिवाराच्या मुलीच जर सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचं काय? असा सवाल रक्षा खडसेंनी पोलिसांना विचारल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी रक्षा खडसेंनी केली आहे.
“आमच्या येथे संत मुक्ताईची यात्रा असते दरवर्षी महाशिवरात्रीला. परवा रात्री माझी मुलगी या यात्रेमध्ये गेली होती. काही मुलांनी तिची छेड काढली. मी माझ्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी आली आहे,” असं रक्षा खडसे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करुन बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर माजी मंत्री(Minister) एकनाथ खडसेंनी, ‘झी 24 तास’शी बोलताना संताप व्यक्त केला आहे. “वस्तूस्थिती आहे की महिलांनी सुरक्षेसंदर्भात काळजी घेण्याची गरज आहे. या मुलांसंदर्भातील तक्रारी या आधीच पोलिसांकडे गेलेल्या आहेत. टवाळखोर पोरं सराईत गुन्हेगार आहेत. यांच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत. चार पाच मुलींचे व्हिडीओ काढले वगैरे प्रकार घडलेत.
राज्यभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आरोपींमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. अनेकदा मुली पुढे येत नाहीत. मात्र आपणच पुढे आलं पाहिजे. म्हणूनच ती तक्रार करण्यासाठी गेली आहे. आपल्या मुलीचं नाव येऊ नये असं पालकांना वाटतं. अखेर नाइल झाल्याने त्यांना आज तक्रार करण्यासाठी जावं लागलं,” असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.
“घटना दोन दिवसांपूर्वी घडली. डीएसपीबरोबर मी स्वत: बोललो, एआयजींबरोबर बोललो. रश्मी शुक्लांशी बोललो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दोन तास बसवलं गेलं. मुलींचा विषय आहे विचार करा असं सांगण्यात आलं. त्याने पोलिसांना मारहाण केली. तो पोलिसांना मारहाण करेपर्यंत प्रकरण गेलं. त्याला जामीन मिळाला. या लोकांना राजकीय संरक्षण असल्याने त्यांना काहीच होत नाही. घटना घडल्यानंतर चर्चा होतात. पण घटना होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे,” असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
पत्नीसोबत मिळून घरीच चालवायचा ‘तो’ देहव्यापाराचा धंदा; बडतर्फ पोलिसाचे घृणास्पद कृत्य
माशाला पाजली दारू अन् मग पुढे काय घडलं???, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
‘अंखियों से गोली मारे’ वर गोविंदाचा मुलाचा आणि रवीनाच्या लेकीचा VIDEO