राज्यात तिसऱ्या टप्प्यात 54.09 टक्के मतदान

आज देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील 11 लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. तिसऱ्या टप्प्यात राज्यात 54,09 टक्के मतदान झाले. यातच कोल्हापुरात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झाले. तर बारामतीत सर्वात कमी 47.84 टक्के मतदान झाले आहे.