अनेक लोकांना सोन्याचे दागिने किंवा अंगठी घालण्याची हौस असते. (finger) हातात सोन्याची अंगठी घातल्याने संपत्ती आणि यश मिळते, तसेच भरभराट होते असं अनेकांना वाटतं. पण अनेकांना कोणत्या हातात किंवा कोणत्या बोटात सोन्याची अंगठी घालायचे याची माहिती नसते. तुम्ही चुकीच्या बोटात सोन्याची अंगठी घातली तर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे अंगठी घालण्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारतीय संस्कृतीत सोन्याला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. प्राचीन काळी भारतात सोन्याचा धूर निघायचा असंही म्हटलं जातं. सध्याच्या काळात लग्न, सण, पूजा किंवा शुभ कार्यात सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात घातले जातात. सोने हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.(finger) सोन्याचे दागिने घातल्यास घरात सुख-शांती नांदते आणि जीवनात सकारात्मकता येते असंही मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार सोने घातल्यामुळे सूर्य ग्रह मजबूत होतो. कारण सूर्यामुळे जीवनात ऊर्जा, धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो.
तुम्हाला अंगठी घालायची असेल तर ती अनामिका बोटात म्हणजे करंगळी शेजारच्या बोटात घालावी. याचे कारण म्हणजे अनामिका बोटाच्या नसा थेट हृदयाशी जोडल्या जातात असे मानले जाते. या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने आर्थिक फायदा तर होतोच मात्र जीवनात सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. तसेच करंगळीत सोन्याची अंगठी घालणे देखील शुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार हाताच्या मधल्या बोटात सोन्याची अंगठी घालून नये. कारण मधले बोट हे शनि ग्रहाशी संबंधित आहे. या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने शनि आणि सूर्य यांच्यात संघर्ष होतो. यामुळे तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे आर्थिक नुकसान होते. (finger) तसेच जीवनात अडथळे येतात. त्यामुळे चुकूनही मधले बोटात कधीही सोन्याची अंगठी घालू नके.
आपल्या हाताचा अंगठा चंद्राचे प्रतीक मानले जातो. त्यामुळे त्यातही सोन्याची अंगठी घालू नये. मात्र अंगठ्यात अंगठी घालणे विरळ आहे. मात्र तुम्हाला अंगठ्यात अंगठी घालायची असेल तर चांदीची अंगठी घालू शकता. कारण ही अंगठी शुभ मानली जाते.
हेही वाचा :