भावासाठी ‘मविआ’ला तिलांजली? उद्धव घेणार मोठा निर्णय; ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. उद्धव ठाकरे(politics) आणि राज ठाकरे या निमित्ताने जवळपास 20 वर्षांनी पुन्हा एकत्र दिसतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र ही युती करताना ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार की काय? अशी चर्चा आणि कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे. यामागील कारण ठरत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्त संजय राऊत यांनी केलेलं एक विधान.

ठाकरे बंधू एकत्र येण्यावरुन पत्रकारांच्या प्रश्नाला राऊत यांनी उत्तर दिलं. “पक्षाच्या बैठकीतल्या बातम्या तुमच्यापर्यंत येत आहेत त्या चुकीच्या आहेत या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत चर्चा झालेली नाही,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच, “आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भूमिका ही याबाबतीत अत्यंत पारदर्शक आहे.

मराठी माणसाची एकजूट राहावी मराठी माणसांना एकत्रितपणे राजकारण करावे ही त्यांची भूमिका आहे. काल अमित शहा यासारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला डीवचून गेले अशा नांग्या मराठी माणसाने एकत्र येऊन ठेचू द्या, ही भूमिका उद्धव ठाकरेंचीसुद्धा आहे. हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे,” असं राऊत म्हणाले.

“सध्या महाराष्ट्रात(politics) दोनच समाविचारी पक्ष आहेत. दोनच समाविचारे नेते आहेत. एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे!” असं सूचक विधान राऊत यांनी केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आहे. मात्र आता ते राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी महाविकास आघाडीची साथ सोडणार की काय अशी चर्चा राऊतांचं विधान ऐकल्यानंतर सुरु झाली आहे. राऊतांच्या विधानाचा इशारा त्याच दिशेने तर नाही ना? असंही बोललं जात आहे.

“आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं हे विचारणार नाही आणि विचारलेलंसुद्धा नाही. कोण काय बोलत आहे त्याच्यावर आमच्या भूमिका ठरणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांमध्ये जो संवाद आहे किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरतात. आता मी काय बोलतो या शनि किंवा अन्य कोण काय बोलत असेल मी माझ्या पक्षामधील जी काय मानसिकता आहे ते मी सांगत आहे.

आमच्या सगळ्यांची मानसिकता योग्य दिशेने चालली आहे. “20 वर्षांपूर्वी, 19 वर्षांपूर्वी, 18 वर्षांपूर्वी आम्हीसुद्धा काँग्रेसबरोबर नव्हतो पण महाराष्ट्राची गरज म्हणून 2019 ला आम्ही एकत्र आलो. भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेईमानीविरुद्ध आम्ही एकत्र आलो. प्रश्न इतकाच आहे आमच्याबरोबर 25 वर्ष राहिलेले लोक बेईमानी करून निघून गेले भाजपसारखी लोक,” असं राऊत म्हणाले.

स्वातंत्र्य युद्धादरम्यान भाजपावाले गोपनीय माहिती ब्रिटिशांना पुरवत होते “अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही महाराष्ट्र देखील सरकार बनवलं. संसदेत लोकशाहीत असं सरकार बनवणं हा काही अपराध नाही देशाच्या राजकारणात(politics) आणि महाराष्ट्रात अशी सरकार यापूर्वी बनलेली आहेत.

काँग्रेसने या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत प्रचंड योगदान दिलं भारतीय जनता पक्ष किंवा किंवा त्यांचे तेव्हाचे लोक ब्रिटीशांचे खबरी म्हणून काम करत होते आणि भगतसिंग यांच्या शहिदांच्या किंवा अनेक प्रमुख शहिदांच्या किंवा क्रांतिकारकांच्या गोपनीय माहिती ब्रिटिशांना पुरवत होते तेव्हा काँग्रेस गांधी नेहरू, सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली या देशात स्वातंत्र्याचा लढा लढत होते. हे सत्य आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळाला तेव्हा आम्ही नव्हतो काँग्रेस होती. तेव्हा भाजप नव्हता काँग्रेस होती. मतभेद काही असले तरी देशाच्या उभारणीमध्ये नरेंद्र मोदी यांनी देश उभा नाही केला. देश हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये गेल्या साठ वर्षात उत्तम प्रकारे उभा केला,” असं राऊत म्हणाले.

हेही वाचा :