RCB ला मोठा धक्का? BCCI कडून 1 वर्षाच्या बंदीची शक्यता!

आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(RCB ) संघाच्या आनंदात अचानक दुःखाची छाया पडली आहे. संघाच्या विजय मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर RCB संघ अडचणीत सापडला असून, बीसीसीआय कडून संघावर एक वर्षासाठी बंदी घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिरवणूक उत्सवाचं दुःखद रूपांतर :
३ जून रोजी RCB ने पंजाब किंग्जवर विजय मिळवत प्रथमच आयपीएल ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक यशानंतर संघाचे चाहते मोठ्या संख्येने बंगळुरूच्या(RCB ) एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु गर्दी नियंत्रणात राहिली नाही आणि चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ११ लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक जण जखमी झाले.

या दुर्घटनेनंतर RCB व्यवस्थापनाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे, तर एका व्यक्तीला अटकही झाली आहे. बीसीसीआयने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, RCB व्यवस्थापनाची जबाबदारी असल्याचे आढळल्यास संघावर एक वर्षासाठी बंदी घालण्याचा विचार सुरू आहे.

फ्रँचायझी करारांत स्पष्ट अटी :
BCCI च्या आयपीएल फ्रँचायझी करारांमध्ये सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित कडक अटी आहेत. या अटींचा भंग झाल्यास संबंधित फ्रँचायझींवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. RCB कडून जर निष्काळजीपणा सिद्ध झाला, तर BCCI संघाला २०२६ आयपीएलसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेऊ शकते.

BCCI चे सचिव जय शाह आणि बोर्डचे अन्य अधिकारी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. BCCI चे प्रमुख देवजित सैकिया यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर कारवाईचा संकेत दिला आहे. चाहत्यांची सुरक्षा सर्वोच्च असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर RCB च्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा :