खळबळजनक! मतदानाच्या दिवशीच नेत्याची हत्या

श्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशीच तृणमुल काँग्रेसच्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

देशभरातील ९६ लोकसभा मतदार संघांसाठी आज मतदान होत आहे. देशभरात(leadership development)मतदार मतदान केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत. अशातच पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशीच तृणमुल काँग्रेसच्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर आली आहे. बंगालमधील पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्राममध्ये रविवारी रात्री १२ मे २०२४ तृणमूल काँग्रेस TMC कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. मिंटू शेख असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर बॉम्बने हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिंटू शेख निवडणुकीचे काम आटोपून घरी (leadership development)परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. सीपीएम-समर्थकांनी त्यांची हत्या केल्याचा दावा टीएमसी नेतृत्वाने केला आहे. तर टीएमसी पक्षातील गटबाजीतून मिंटू शेखची हत्या झाल्याचा दावा सीपीएमने केला आहे. तसेच जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा दावा

पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतुग्राम पीएस अंतर्गत आंखोना ग्रा.पं. चेचुरी गावातील मिंटू दुचाकीवरून जात असताना, त्याच भागातील काही लोकांनी त्याला अडवले. मिंटूने पळून (leadership development)जाण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर बॉम्ब फेकण्यात आला, त्यात त्याचा मृत्यू झाला. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. दरम्यान, या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा :

धाराशिव शहराच्या नावामागचा जाणून घ्या रंजक असा इतिहास

शेतकऱ्यांच लक्ष लागलेल्या भेंडवळच भाकीत आलं समोर

अवकाळी पावसाचा ‘महावितरण’ ला तब्बल 44 लाखांचे नुकसान फटका