श्रेयस अय्यरने भलेही आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जला विजय मिळवून दिला नसेल(address ) पण या संपूर्ण सिजनमध्ये एक गोष्ट मात्र सातत्याने समोर आली ती म्हणजे श्रेयसची लीडरशिप. श्रेयस अय्यरचा पंजाब किंग्ज संघ त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून फक्त 6 धावांनी पराभूत झाला. पण हा हंगाम अय्यरसाठी वैयक्तिकरित्या चांगला होता. त्याने सलग दोन हंगामात दोन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत नेले आहे. 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला. आता अशी बातमी आहे की अय्यर भारताच्या व्हाईट बॉल क्रिकेट संघाचा कर्णधार होऊ शकतो.
बीसीसीआयने अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. (address )भारत आता बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. परंतु अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीला वारंवार आठवण करून दिली जात आहे की रोहित शर्मानंतर अय्यर हा भारतासाठी सर्वोत्तम पर्याय का असू शकतो. पंजाब किंग्जचे सहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन यांनी एका पॉडकास्टमध्ये अय्यरच्या कर्णधारपदाची एक कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की अय्यरला त्याच्या कर्णधारपदाचे तितके श्रेय मिळाले नाही जितके त्याला मिळायला हवे होते.
ब्रॅड हॅडिनने श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाबद्दल एक नवीन गोष्ट सांगितली. तो म्हणाला की अय्यरला त्याच्या नेतृत्वाबद्दल फारसे कौतुक मिळाले नाही. हॅडिनन अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर 2 सामन्याबद्दल सांगितले. तो म्हणाला की तिथली परिस्थिती आणि मागील रेकॉर्ड पाहता असे वाटले की प्रथम फलंदाजी करावी. संघ व्यवस्थापनानेही तेच ठरवले होते. पण अय्यरने शेवटच्या क्षणी सांगितले की तो प्रथम गोलंदाजी करू इच्छितो. त्याला विश्वास होता की तो संघाला विजयाकडे नेऊ शकेल. (address )यानंतर कर्णधाराने शानदार फलंदाजी केली. 2014 नंतर पहिल्यांदाच पंजाब किंग्ज आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला.
‘तुम्ही सामन्यासाठी पूर्ण तयारी केलेली असते. अहमदाबादच्या स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करायला सांगितली जात होती. आकडेवारीनुसार आणि संघानुसार प्रथम फलंदाजी करणे योग्य होते. इथेच श्रेयसला कर्णधार म्हणून जितके श्रेय मिळायला हवे होते तितके मिळाले नाही. मला अशा आहे की जेव्हा ते भारताचा कर्णधार निवडण्याचा विचार करतील तेव्हा ते अय्यरकडे नक्कीच लक्ष देतील. तो संपूर्ण स्पर्धेत खूप चांगला होता. प्रत्येक जण त्याला सांगत होता प्रथम फलंदाजी करा, पण श्रेयस त्याच्या निर्णयावर ठाम होता आणि त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मग कर्णधार दुसऱ्या डावात फलंदाजी करायला आला आणि त्याने आयपीएलमध्ये मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळला आणि आम्हाला अंतिम फेरीत नेले.’ असं कोच हॅडिन म्हणाले.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 204 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जने अय्यरच्या 41 चेंडूत नाबाद 87 धावांच्या खेळीमुळे एक षटक शिल्लक असताना लक्ष्य गाठले. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात अय्यरने शानदार कामगिरी केली. या संपूर्ण घटनेतून श्रेयस अय्यरची कर्णधारपदाची क्षमता आणि कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता दिसून येते. ब्रॅड हॅडिनचे हे विधान बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना एक मजबूत संदेश आहे की भारताच्या व्हाईट बॉल क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी अय्यरचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अय्यरने त्याच्या नेतृत्वाखाली तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत नेले आहे, जे त्याच्या नेतृत्वगुणाचे दर्शन घडवते. याशिवाय, त्याने कठीण काळात संघाला विजय मिळवून दिला आहे, जे एका चांगल्या कर्णधाराचे लक्षण आहे.
हेही वाचा :