राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे.(Thunderstorms) गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज सकाळपासून पुण्यासह मुंबईतही हलक्याशा सरींची हजेरी लागली आहे.हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 7 जूनपासून पुढील 4-5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर या ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याचा यलो अलर्ट, पुढील काही तास महत्त्वाचे :
हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के.एस. होसाळीकर यांच्या माहितीनुसार, (Thunderstorms)आज सकाळी 9 वाजेच्या सॅटेलाइट निरीक्षणानुसार पुणे, सोलापूर, सातारा परिसरात तीव्र वादळी ढग तयार झाले आहेत. यामुळे पुढील 3-4 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, रायगड येथेही पुढील काही तास हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. हवामान खात्याने पालघर, रत्नागिरी, नाशिक, अमरावती, बुलढाणा, बीड, परभणी, लातूर, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
IMD च्या अंदाजानुसार, 7 ते 9 जून दरम्यान पावसाच्या लाटांमध्ये चढ-उतार दिसून येतील. मात्र,(Thunderstorms)विशेषतः 13 ते 18 जून या कालावधीत राज्यात अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात नाले, ओढे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकण, खान्देश, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेती, प्रवास आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे.
हेही वाचा :