आता सामान्यांना आणखी जबर धक्का, खाद्यतेल थेट…सामान्यांचे प्रचंड हाल!

अमेरिका-इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे.(trouble)या युद्धाचा भारताला पटका बसत आहे. महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल यासारक्या इंधनांचा भाव वाढल्याने आाता खाद्य तेलही महागले आहे.गेल्या दोन महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो मागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. पाम तेल विदेशातून येते. त्यातही भाववाढ झाली आहेय. सध्या म्हणावी तशी लग्नसराई नाहीये. उन वाढले आहे. त्यामुळे बाजारात तेजी नाही.

भविष्यात पाम तेलाच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (trouble) सध्याची परिस्थिती लक्षात घेता बाजारातील मोठे व्यापारी भविष्याती लवकरच भाववाढ होऊ शकते, असे सांगत आहेत. ही भाववाढ झाली तर त्याचा मोठा फटका सामान्यांना बसण्याची दाट शक्यता आहे.आधी जवस, करडी तेल आपल्याकडेच तयार व्हायचे. मात्र आता आपण तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो.

त्याचा फटका सामान्य माणसाला बसतो त्यामुळे तेल बिया उत्पादनात वाढ (trouble) करण्याची गरज असल्याचंही नागपूरच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.दरम्यान, भविष्यात तेलाचा भाव वाढला तर सामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. एका लिटरमागे सामान्यांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात. आता आगामी दिवसांत नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा

शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?

पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?

वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला