भारताच्या हल्ल्यामुळे क्रिकेट विश्वातही भीतीच वातावरण, PSL सोडून पळणार आंतरराष्ट्रीय खेळाडू?

ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने १० मे पर्यंत ९ विमानतळ(Airport) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड सारख्या विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय ज्या प्रवाशांची वैध तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रिशेड्युलिंगमध्ये सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

एअर इंडियाने १० मे रोजी सकाळी ०५:२९ वाजेपर्यंत ९ शहरांमधील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यासोबतच इंडिगो एअरलाइन्सने १६० देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, दिल्ली विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या वेगवेगळ्या विमान कंपन्यांची २० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

अमृतसरमधील श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ(Airport) पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आले आहे. एडीसीपी-२ सिरीवेनेला, आयपीएस, म्हणाले की त्यांना सर्व उड्डाणे रद्द करण्याचे आणि पुढील आदेश येईपर्यंत विमानतळ बंद करण्याचे निर्देश मिळाले आहेत.

कतार एअरवेजने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर म्हटले आहे की, ‘पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. एअरलाइन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राहील.

हेही वाचा :

घराबाहेर मुले खेळत होती, तेवढ्यात बिबट्या धावत आला अन्…Video Viral

महाराष्ट्रात आजही वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी दक्षतेचा इशारा

त्यांनी कुंकू पुसण्याचा पाप केलं…; ऑपरेशन सिंदूरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया