किमान निर्मिती खर्चात साकारलेला आणि जगभरात दमदार कामगिरी करणारा ‘कांतारा’ हा दाक्षिणात्य चित्रपट लवकरत एका नव्या रुपात आणि नव्या कथेसह, नव्या आवृत्तीसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता(Actor) ऋषभ शेट्टी याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘कांतारा 2’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचं काम सुरू असून, त्याचदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडल्यानं संपूर्ण सेटवर भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कपिल नावाचा एक ज्युनिअर आर्टिस्ट कोल्लूर सौपर्णिका या नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. चित्रीकरणातून विश्रांती आणि जेवण्यासाठीची सुट्टी होताच त्यानं पोहायला जाण्यास ठरवलं आणि तो नदीत उतरला. मात्र अचानकच तो नदीच्या खोल भागात पोहोचला जिथं त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि वेगवान प्रवाहाच्या विळख्यात आल्यानं तो पाण्याच्याच सोबत वाहत गेला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
सदर घटनेनंतर स्थानिक अग्निशमन विभागानं त्याचा शोध घेतला असता सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. कोल्लूर पोलीस ठाण्यात या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान चित्रीकरण सुरू असणाऱ्या ‘कांतारा 2’ त्या सेटवर मात्र आनंदाचं वातावरणावर विरजण पडून क्षणात शोककळा पसरली. या घटनेनंतर चित्रीकरणही थांबवण्यात आलं.
कांताराच्या निर्माते आणि कलाकारांना(Actor) अशा परिस्थितीचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा चित्रपटाच्या निर्मितीसंस्थेला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. कोल्लूर इथं चित्रपटातील ज्युनिअर आर्टिस्टना नेणारी एक बस पलटी झाल्यानं एक भयंकर अपघात या टीमनं पाहिला.

सुदैवानं यात मोठी हानी झाली नाही. या चित्रपटाच्या सेटनं निसर्गाचा माराही सोसला. याशिवाय चित्रीकरणादरम्यान स्थानिक जीवसृष्टीला बाधित केल्याप्रकरणी वनविभागानं या टीमला कायद्याच्या कचाट्यात आणलं होतं. त्यामुळं या चित्रपटापुढची आव्हानंच संपत नसल्यानं काहीशी नकारात्मकता सध्या संपूर्ण सेटवर आणि टीममध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
घटस्फोटानंतर 4 वर्षांनी समांथा विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात,नात्याची कबुली?
दीर रोज रात्री यायचा…4 वर्षे या कानाची त्या कानाला खबर नव्हती, पण…
राष्ट्रवादीची ताकद वाढणार लवकरच सगळ्यांचं मनोमिलन अजितदादांच्या जवळच्या नेत्याचं मोठं विधान