राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी(ration card) सरकारकडून महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. ई-केवायसी न करणाऱ्यांचे नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.

सरकारकडून सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे मोफत किंवा सवलतीच्या दरात तांदूळ, गहू, साखर यासारखे अन्नधान्य रेशनद्वारे(ration card) दिलं जातं. मात्र याचा योग्य लाभ फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, या उद्देशाने रेशन कार्डसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे सरकारला हे सुनिश्चित करता येते की, फक्त खरी पात्र कुटुंबेच रेशनचा लाभ घेत आहेत, आणि गैरवापर रोखता येतो.

ई-केवायसी का आवश्यक आहे? :
– आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक केल्याने कार्डधारकांची ओळख निश्चित होते.
– पात्रतेची पडताळणी करता येते.
– बोगस कार्डधारक ओळखता येतात.
– गरजू लोकांपर्यंत अनुदानित धान्याचा योग्य वाटप सुनिश्चित करता येतो.
– सरकारी यंत्रणेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढते.
शिधावाटप विभागाने स्पष्ट केलं आहे की, ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेलं नाही, त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा त्यांचं नाव बोगस कार्डधारक यादीत जाऊ शकतं आणि ते कायमस्वरूपी लाभातून वंचित राहू शकतात.
हेही वाचा :