भाजप उमेदवारावर ‘या’ राज्यात हल्ला,लोक दगडाचा मारा करत होते;

माझ्या सुरक्षा रक्षकांनी अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्यांच्यावर तुटून पडले. त्यामुळे सुरक्षा रक्षक प्रचंड जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात (hospital)दाखल करण्यात आले आहे. माझ्या सोबतच्या सीआयएसएफच्या दोन जवानांची डोकी फुटली आहेत असे भाजपाचे उमेदवाराने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

लोकसभेचा सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी पार पडले. पश्चिम बंगालच्या आठ लोकसभा जागांवर आज मतदान झाले. या दरम्यान, एक विचित्र घटना घडली. झारग्राम येथील मोंगलापोटा येथे भाजपा नेता आणि झारग्रामचे उमेदवार प्रणत टुडू यांच्या जमावाने हल्ला केला. त्यांच्यावर अक्षरश: दगडफेक झाली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. यात भाजपा उमेदवार जीव तोडून धावताना दिसत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांना त्यांना कसे बसे या जमावाच्या तावडीतून वाचविल्याने पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात भाजपा उमेदवार नेते प्रणत टुडू यांनी ममता सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील गरबेटा परिसरात आपल्या ताफ्यावर हल्ला झाल्याचे भाजपा नेते प्रणत टुडू यांनी दावा केला आहे. त्यामुळे त्यांना वाचविताना त्यांचे सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले आहे. काही मतदान केंद्रांवर भाजपाच्या एजंटना प्रवेश नाकारल्याची तक्रारी आल्यानंतर प्रणत त्याची खातरजमा करण्यासाठी गारबेटा येथे जात होते. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मोठी कुमक बोलाविण्यात आली. त्यानंतर टीएमसीच्या गुंडांनी माझ्या कारवर अचानक दगडफेक करायला सुरुवात केली आणि रस्ता संपूर्णपण ब्लॉक केला. जेव्हा माझ्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्यांच्यावर तुटून पडले. त्यात ते प्रचंड जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे भाजपा उमेदवार प्रणत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. आपल्या सोबतच्या सीआयएसएफच्या दोन जवानांची डोकी फुटली आहेत, त्यांना रुग्णालयात भरती केल्याचे प्रणत टुडू यांनी सांगितले.

हेही वाचा :

इस्रायली महिलेशी हमासच्या बाप-लेकाचे राक्षसी कृत्य; आधी वडिलांनी मग लेकाने बलात्कार केला.

महापालिकेने दर्शवला धोक्याचा डेंजर झोन, पुरग्रस्तांसाठी पूर्वसूचना

कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्यावर तगडा पहारा; प्रशासनावर ही वेळ का आली?