स्वस्त धान्य वाटपाबाबत सरकारचा मोठा निर्णय! आता हे होणार…

राज्यातील रेशन कार्डधारक(ration card) आणि दुकानदारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मे महिन्यातील अन्नधान्य उचल प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना वेळेवर रेशन मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत, धान्य उचलण्याची अंतिम मुदत १७ मेपर्यंत वाढवली आहे.

भारतीय अन्न महामंडळाकडून एप्रिल अखेरीस आवश्यक त्या प्रमाणात धान्याचा पुरवठा न झाल्याने राज्यात फक्त ६,००० टन धान्यच उचलता आलं, जे दरमहा आवश्यक असलेल्या १४,००० टनांपेक्षा फारच कमी आहे. यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत मेच्या सुरुवातीस रेशन (ration card)मिळण्यात अडचण निर्माण झाली.

उत्पन्न गटानुसार स्वस्त धान्यावर अवलंबून असलेल्या लाखो लाभार्थ्यांना यामुळे फटका बसला. त्यामुळे सरकारने १७ मेपर्यंत धान्य उचलण्याची मुदत वाढवली असून, जून महिन्यासाठी आवश्यक १४,००० टन धान्य ३० मेपूर्वी उचलण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सध्या पुण्यात ५०% रेशन दुकानांमध्ये धान्य पोहोचले असून काही ठिकाणी वितरण सुरूही झालं आहे. उर्वरित दुकानांमध्ये लवकरच धान्य पोहोचेल, असे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र रेशन दुकानदार आणि ग्राहकांनी झालेल्या विलंबावर नाराजी व्यक्त केली आहे.

एका रेशन दुकानदाराने सांगितले, “FCI कडून वेळेवर धान्य न आल्यामुळे ग्राहक आमच्यावर रागावतात. मुदतवाढ झाल्यामुळे आता काहीसा दिलासा मिळेल.” तर एका ग्राहकाने म्हटलं, “आम्ही रेशनवर अवलंबून असतो. उशिरामुळे बाजारातून महागात खरेदी करावी लागली.”

राज्य सरकारच्या मुदतवाढीच्या निर्णयामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, FCI आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय वाढवणं अत्यावश्यक आहे. भविष्यात अशा अडचणी टाळण्यासाठी नियोजनबद्ध वितरण आणि वेळेवर पुरवठा ही गरज असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :

राज्याच्या ‘या’ भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण? ‘या’ 3 नावांची चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भाकरी फिरणार? शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर पुन्हा….