गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण… ; उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2024/05/image-72.png)
आयपीएल बघताना समजत नाही कोण कुठून खेळतात हे कळत नाही तिथं बोली(prolash) लावली जाते आता राजकारणात बोली लागते. रायगड शिवाजी महाराजांचा , त्यांनी काहीतरी विचार केला असेल इथल्या मातीचा आणि माणसांचे गुण ओळखले असतील, पण भाजप म्हणतंय चोरा मी वंदिले, अशी वेळ का आली ? आज नरेंद्र मोदी, अमित शहा महाराष्ट्रात सभा घेत आहेत.
शिवसेना सोबत होती तेंव्हा एवढ्या(prolash) सभा कधी घेतल्या नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींना लगवला आहे. माझ्यावर संकट आणून बघा हे सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे. तुम्ही माझ्यासाठी संकट आहात. लोक चिडून उठलेत, ते वाट बघत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
जिथं जातो तिथं लोक सांगतात आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे माझे निवडणूक रोखे आहेत. अजित पवार, तटकरे यांच्यावर आरोप कुणी केले होते. मी गुजरात विरोधात कधीच नव्हतो गुजरातचा विकास करताना महाराष्ट्राच्या तोंडातील घास हिरावून घेता. अनेक प्रकल्प गुजरातला गेले. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर महाराष्ट्राचे वैभव परत आणणार आहे. तसंच भाजपने कितीही दरवाजे उघडले तरी मी येणार नाही, असं म्हटलं आहे.
नरेद्र मोदींच्या पराभवामुळे हिंदुस्तानात फटाके फुटतील. तुम्ही जिंकलात तर चायनामध्ये फटाके फुटतील. तुम्ही सर्वांना सर्वकाळ फसवू शकणार नाही. संपूर्ण देशाला जाग आलेली आहे. मंत्र्यांना न विचारता नोट बंदी केली. लोकांची मन की बात ऐकणारे आणि त्यांच्या भावना जाणणारे सरकार हवं आहे.
हेही वाचा :
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे दोन वर्षानंतर ब्रेकअप
स्टेडियमवर पुन्हा एकदा दिसली विराट-अनुष्काची रोमँटिक केमिस्ट्री
रणबीर कपूर एकाच वेळी चार मुलींसोबत होता रिलेशनमध्ये