मी खूर्चीसह बाहेर फेकलो गेलो; बचावलेल्या विश्वकुमारने मोदींना काय सांगितलं?

गुजरामधील अहमदाबादमध्ये काल 12 जून रोजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात होऊन तब्बल 241 जणांचा मृत्यू झालायं. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान उड्डाण घेताच अवघ्या काही मिनिटांतच हा अपघात झालायं. एअर इंडियाचं हे विमान मेघानीनगरमधील मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकलं. या दुर्घटनेमध्ये विमानातील एकही प्रवासी जिवंत (rescued )राहिला नसल्याचं समोर आलं होतं.

मात्र, काही वेळानंतर चमत्कारच घडला. या विमानातील एक प्रवासी पायी चालत अॅम्ब्युलन्सपर्यंत पोहोचल्याचं समजलं(rescued ). रमेश विश्वकुमार असं या 40 वर्षीय तरुणाचं नाव असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान रमेश विश्वकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधत विमान अपघाताचा थरारक अनुभव शेअर केलायं.

एअर इंडियाच्या विमानाने अहमदाबादहुन लंडनला जाण्यासाठी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण घेतलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच असं वाटलं की विमान थांबलंय. त्यानंतर विमानामध्ये हिरवी लाईट सुरु झाली.

आम्हाला वाटलं उड्डाण घेण्यासाठी पायलटने रेस दिला असावा, पण काही सेकंदातच विमान थेट इमारतीत शिरलं. या घटनेमध्ये मीदेखील मरणारच असं मला वाटलं होतं, पण थोड्या वेळात मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला समजलं की मी जिवंत आहे. या दुर्घटनेतूम मी कसा जिवंत वाचलो, यावर माझा विश्वास बसत नाही, असं रमेश विश्वकुमारने माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

अपघात घडला तेव्हा मला वाटलं की आता मी देखील मरणार आहे, पण अचानक मी ज्या सीटवर बसलो होतो. त्या सीटसह मी विमानाच्या बाहेर फेकलो गेलो. ज्या सीटवर मी बसलो होतो, त्या सीटवरुन मी बाहेर निघू शकतो असं मला वाटलं.

मी ज्या ठिकाणी पडलो तिथून थोडी जागा बाहेर पडण्यासाठी होती. त्यामुळे मी बाहेर पडू शकतो, दुसऱ्या बाजूने जागा नसल्याने इतर प्रवाशांना बाहेर पडता आलं नसाव. पण मी त्यातून बाहेर पडलो, असल्याचं रमेश विश्वकुमार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, विमान दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट करीत शोक व्यक्त केला आहे. तर टाटांकडून मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा :