पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे! गारपीट अन् वादळी पावसासह ‘शक्ती’ चक्रीवादळ

राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.(important) आजही राज्यात वादळी पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने सांगितली आहे. तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने दक्षतेसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला काही. कालही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती.

आज बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, पुणे, सातारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. देशभर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. बंगाल उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागामध्ये अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैर्ऋत्य मान्सून दाखल झालाय. (important)यातच बंगालच्या उपसागरामध्ये 23 मे ते 18 मे यादरम्यान प्रचंड वेगाने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

तर या संभाव्य चक्रीवादळाचे नाव शक्ती असेल, अशी माहिती मिळतेय. तर 16 ते 18 मे या कालावधीत बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने हरियाणामध्ये जोरदार वादळ, पाऊस आणि गारपिटीचा इशारा जारी केला आहे. (important)राजधानी दिल्लीला हवामान खात्याने 16 मे रोजी मेघगर्जनेसह पावसाचा इशाराही दिला आहे.आज बिहारमधील 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये पुढील 3 दिवस खूप कठीण असणार आहेत.यासोबतच पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा :

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी मेगाभरती 

एसटी महामंडळात काम करण्याची इच्छा असणारांसाठी मोठी आनंदाची बातमी!

पक्ष तोडण्याची लायकी पाकिस्तान तोडण्याची नाही संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र