राज्यात पुन्हा पावसाचे संकट; विदर्भात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात पुन्हा पावसाचे(Rain) संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विदर्भातून केरळपर्यंत हवेची कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

हवेच्या दाबाची ही रेषा विदर्भातून जात आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात शनिवारी हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे.

भंडारा जिल्ह्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस(Rain) धान शेतीसाठी फायदेशीर असला तरी मका, बागायती शेतीसाठी नुकसानकारक आहे. गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी झाली. या पावसामुळे धाण, मका, भाजीपाला आणि इतर पिकांना फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावासह परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे.

राज्यात गेले काही दिवस कडक उन्हाळा जाणवत आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळल्याचे पाहिला मिळाले. काही ठिकाणी उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यंदाच्या पावसाच्या आगमनाबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे.

हेही वाचा :

पंतप्रधान नट-नट्यांसोबत व्यस्थ अन्…; खासदार संजय राऊतांचा घणाघात

4 संकेतावरुन ओळखा जोडीदाराचं तुमच्यासोबतचं नातं मनातून तुटलंय

…अन् मॅचनंतर त्याने थेट पॉन्टिंगच्या बायकोलाच मारली मिठी! भारतीय क्रिकेटरचा Video चर्चेत