वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून टोलमाफी जाहीर; ‘या’ कालावधीत मिळणार टोलमधून सूट

मुंबई : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलैला असून, यात्रा कालावधी 26 जून ते 10 जुलै असा आहे. आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक एसटी बस, खाजगी वाहनांनी येत असतात. या सर्व भाविकांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल(toll ) माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 18 जून ते 10 जुलैदरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. जड आणि हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे. पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल(toll ) माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 18 जून ते 10 जुलैदरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.

आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक एसटी बसने येत असतात. एसटी बसने येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी भीमा बस स्थानक येथे पाच हजार चौरस फुटाचे तीन वॉटरप्रूफ मंडप व ३०० सुलभ शौचालय उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निर्णयानुसार पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. जड आणि हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा :