सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार नव्या आराखड्याचे फोटो समोर

मुंबई मधील जगप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या सुशोभीकरण मोहिमेला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे भूमीपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. हा संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर मंदिर परिसराचे चित्र पूर्णपणे बदलणार असून या परिसराला अत्यंत आधुनिक (Siddhivinayak Temple) तसेच अद्ययावत स्वरूप प्राप्त होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सामाजिक माध्यमांवर या नियोजित प्रकल्पाच्या सुंदर आराखड्याची छायाचित्रे प्रसारित केली असून, बाप्पाचे निवासस्थान एका देखण्या रूपात नटण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.

या सिद्धिविनायक मंदिर परिसरात दररोज हजारो-लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात, हीच गर्दी लक्षात घेऊन भविष्यात त्याचे नियोजन अधिक सुटसुटीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यावर प्रशासनाचा भर आहे. (Siddhivinayak Temple) दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, यादृष्टीने विशेष पावले उचलली जात आहेत. या व्यापक सुशोभीकरण आराखड्यामध्ये केवळ सौंदर्यात भर टाकली जाणार नसून, मंदिराच्या अंतर्गत आणि बाहेरील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक व अभेद्य करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

भाविकांसाठी अद्ययावत कॉरिडॉर आणि पायाभूत सुविधांचा विकास या संपूर्ण प्रकल्पाचा मुख्य हेतू भारत तसेच जगभरातून मुंबईत येणाऱ्या कोट्यवधी गणेशभक्तांचा प्रवास सुकर करणे हा आहे. भाविकांना अतिशय कमी वेळात आणि कोणत्याही अडथळ्याविना थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता यावे, (Siddhivinayak Temple) यासाठी सर्व आधुनिक सोयींनी सज्ज असा एक विशेष कॉरिडॉर या ठिकाणी विकसित केला जात आहे. या अंतर्गत मंदिराकडे येणारे रस्ते, दर्शनासाठी लागणाऱ्या रांगांची आधुनिक व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा दर्जा मोठ्या प्रमाणावर सुधारण्यात येणार आहे. हे बदल पूर्ण झाल्यानंतर येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला अधिक पवित्र आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव येईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.या भव्य भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या सोबतीला सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर आमदार कालिदास कोळंबकर , प्रसाद लाड मुंबईच्या महापौर रितू तावडे उपमहापौर संजय घाडी आणि कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह मंदिराच्या ट्रस्टचे अनेक विश्वस्त आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

जत तालुक्यात पाणी टंचाईचे संकट

आनंदाची बातमी! म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार?

चालकाच्या चुकीने डंपर उड्डाणपुलाला लटकला