महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा(Heavy rain) इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

१० मे रोजी खालील जिल्ह्यांमध्ये पावसाचा(Heavy rain) यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अहिल्यानगर, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली.
११ आणि १२ मे रोजी संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही १२ मेला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गारपिटीमुळे भाजीपाला, फळबागा आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेआधी म्हणजे १३ मेच्या आसपास अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा उन्हाळ्यात तब्बल ५० दिवस उष्णतेची लाट अनुभवली गेल्याने, लवकर येणारा मान्सून नागरिकांसाठी दिलासा ठरू शकतो.
हेही वाचा :
एक हिरवी मिर्ची तुमचं आयुष्य वाढवेल, जाणून घ्या तज्ञांचे मत….
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांचं बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचे प्रेमसंबंध म्हणाले, मी तिच्यासोबत
भारताच्या जबरदस्त प्रहारनंतर पाकिस्तानचे तीन तुकडे होणार?