सस्पेन्स संपला! मान्सूनबाबत सर्वात मोठी गुड न्यूज ‘या’ दिवशी पावसाची एन्ट्री होणार

देशभरात वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना आता मान्सूनबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची पुढील वाटचाल पुन्हा वेग घेत असून पुढील काही दिवसांत केरळसह महाराष्ट्रातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलामुळे मान्सूनसाठी पोषक स्थिती तयार होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण गेल्या काही दिवसांत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी श्रीलंका , अंदमान समुद्र आणि बंगालचा उपसागर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. (monsoon) काही काळ मान्सूनची प्रगती मंदावली असली तरी वातावरणीय घडामोडींमध्ये वेगाने बदल होत असल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

राज्यातही मान्सूनपूर्व हालचाली तीव्र होऊ लागल्या आहेत. प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, कोकण , गोवा (monsoon) तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेषतः 25 ते 28 मे दरम्यान किनारपट्टी भागात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. मध्य महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्येही या काळात पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वारे आणि दमट हवामानाचा प्रभाव मान्सूनपूर्व वातावरणामुळे काही भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. मात्र 27 ते 31 मे या कालावधीत तापमानात मोठा बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले असून, वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा मात्र कायम राहणार आहे.

मुंबई आणि ठाणे परिसरात दुपारनंतर किंवा संध्याकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. आठवडाभर तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. (monsoon) ठाण्यातही दमट हवामानासोबत अधूनमधून गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे शहर आणि परिसरात पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज असून, विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो.हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यात सध्या सुरू असलेल्या या घडामोडी म्हणजे उन्हाळ्यातून मान्सूनकडे होणाऱ्या बदलाचे संकेत आहेत. अद्याप राज्यभर सलग पाऊस सुरू झालेला नसला तरी किनारपट्टी आणि अंतर्गत भागात स्थानिक हवामान प्रणाली सक्रिय राहणार आहे. सध्याची मान्सूनची गती कायम राहिल्यास महाराष्ट्रात 10 जूनच्या आसपास मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा

मान्सूनसंदर्भात महत्वाची बातमी ‘या’ तारखेला होणार एन्ट्री

बनावट, निकृष्ट औषधांवर ‘सीडीएससीओ’चा बडगा

रंकाळा प्रदूषणाबाबत महापालिकेला नोटीस