शिक्षणामुळे माणूस चांगल्या-वाईटाचा फरक ओळखू शकतो. पण आचारणात आणणं अतिशय कठीण असतं. या गोष्टी मनुष्याच्या बुद्ध आणि विवेकावर अवलंबून असतात. असंच म्हणणं विद्वान आचार्य चाणक्य(Acharya Chanakya) यांनी आपल्या चाणक्य नीतिमध्ये म्हटलं आहे.

आचार्य चाणक्य(Acharya Chanakya) म्हणतात की, काही लोकं कितीही शिक्षणतज्ज्ञ असोत, कोणत्याही मोठ्या पदावर असोत पण त्यांचं आचरण अगदी मूर्ख लोकांसमान असतं. अशा लोकांना सुशिक्षित मूर्ख म्हणून संबोधलं जातं. आर्य चाणक्यांनी सांगितलेले त्यांचे 4 पर्याय पाहू.
सर्वज्ञानी समजणारे लोक
आचार्य चाणक्य सांगतात की, ज्या लोकांना वाटतं ते सर्वज्ञानी आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी येतात, त्यांच्यासारखा मूर्ख माणूस कुणी नाही. या लोकांचा लोकप्रिय पर्याय म्हणजे एकमेकांना ज्ञान देणे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबाबत त्यांना फार कमी माहिती असेल पण ज्ञान असं देतात की, हे प्रचंड पंडीत आहेत. पण अशा पद्धतीच्या लोकांची कायमच मागे खिल्ली उडवली जाते.
दुसऱ्यांचा कमीपणा करणे
आचार्य चाणक्य(Acharya Chanakya) आपल्या नीतिमध्ये सांगतात की, जे व्यक्ती आपल्यापेक्षा कमकुवत लोकांना कमी लेखतात किंवा त्यांच्याशी अतिशय चुकीचा व्यवहार करतात. त्यामुळे ते सगळ्यांसमोर मूर्ख समजले जातात. असे लोक कितीही शिकले तरी ते फार उच्च पदावर पोहोचू शकत नाहीत. अशा लोकांना प्रेम आणि सन्मान मिळत नाही.

कायम स्वतःच कौतुक करणे
काही लोकांना वाटतं की, जगातील सर्वात चांगली व्यक्ती आपणच आहोत. स्वतःच कौतुक करणे चुकीचे नाही पण कायमच आपला मोठेपणा मारणे चुकीचे आहे. आचार्य चाणक्य सांगतात की, असे लोक कायम धन, संपत्ती आणि आपल्या इतर गोष्टींचा बडेजावपणा मारतात. दुसऱ्यांचं कौतुक या लोकांना अजिबात सहन होत नाही.
विचार न करता काम करणारे लोक
आर्य चाणक्य म्हणतात की, या व्यक्ती कधीच विचार करुन बोलत नाहीत आणि कामही करत नाही. सतत घाई करत हे निर्णय घेतात. यांच्या या स्वभावामुळे बाजूचे लोक देखील संकटात पडतात. एखादी व्यक्ती कितीही हुशार असली तरीही ही व्यक्ती घाईगडबडीत कायम चुकीचाच निर्णय घेते.
हेही वाचा :
अनुराग कश्यपची मुलगीही त्याच ठिकाणी हनिमूनला, ‘दोन दिवस…’
बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु…
तुमच्या टूथपेस्टमध्ये विषारी घटकपदार्थ? ब्रश करण्याआधी 100 वेळा कराल विचार!