हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मागील काही वर्षात अनेक नवीन चेहऱ्यांनी प्रवेश केला आहे. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री (actress )सुरवीन चावला! ‘सेक्रेड गेम्स’, ‘हेट स्टोरी 2’, ‘राणा नायडू’सारख्या चित्रपटांबरोबर इतरही अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरवीनने आपल्या कामाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे.
हिंदीमध्ये नुकतीच करिअरला सुरुवात केलेल्या सुरवीनने यापूर्वी दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा नुकताच एका मुलाखतीमध्ये केला आहे. मात्र आपली शरीरयष्टी खूप पातळ असल्याने नाकारण्यात आल्याचं तिने सांगितलं. तसेच दक्षिणात्य चित्रपटांसाठी वजन वाढवण्यास सांगण्यात आल्याचा खुलासा सुरवीनने केला आहे. तिने मनोरंजसृष्टीमध्ये कलाकारांना कशाप्रकारे वागवलं जातं याबद्दलही भाष्य केलं आहे.
सुरवीनने 2011 मध्ये ‘हम तुम शबाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ‘कसौटी जिंदगी की’, ‘कहीं तो होगा’ आणि ‘काजल’ यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केले होते. सुरवीनने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. छोट्या पडद्यावरील कलाकारांना गुरांसारखे कसे वागवले जायचे याची आठवणही सुरवीनने(actress ) करून दिली. “मी ‘कहीं तो होगा’ मालिकेत काम करायचे. मात्र त्या मालिकेच्या दिग्दर्शकासोबत काम करताना सर्वच महिलांना अडचण येत होती. तो सर्वांना गुरांसारखे वागवायचा. पण तो बालाजी टेलिफिल्म्सचा लाडका होता,” असे सुरवीनने सांगितले.
सुरवीन म्हणाली, “मी या दिग्दर्शकाबद्दल स्पष्टपणे बोलल्याने माझ्यावर टीकाही होऊ शकते कारण त्यांनीच मला मनोरंजनसृष्टीत पहिल्यांदा संधी दिली. पण मला हे असं वागवणं आवडत नाही. तुम्ही कोणाचेही मालक नाही हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही त्यांना पैसे देत आहात कारण ते काम करत आहेत. त्यापलीकडे, तुम्ही त्यांचे मालक नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.” मालिकांमध्ये काम केल्याने माझा चेहरा लोकांच्या ओळखीचा असल्याने अनेक दिग्दर्शकांना मी ‘ओव्हरएक्सपोज्ड’ असल्याचं वाटलं. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं आणि त्यामुळेच मला अनेक चित्रपट सोडावे लागले, असंही सुरवीन म्हणाली.
सुरवीनने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्रींना(actress ) वजन वाढवावे लागते का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सुरवीनने तिला आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. वजन वाढवावे लागते असं सांगताना सुरवीनने, “हो, मला सांगण्यात आले होते की तू खूप बारीक आहेस, सडपातळ आहेस कारण तुझी छाती दिसत नाही,” असं म्हटलं. तसेच अत्यंत वाईट शब्दांमध्ये मला माझ्या शरीरयष्टीवरुन सुनावण्यात आल्याचंही सुरवीनने मुलाखतीत सांगितलं.
“कुछ हिलेगा नहीं, (काहीही हलणार नाही) काहीही उसळणार नाही. तुझ्या छातीत उभार नाही… असं मला सांगण्यात आलेलं. आता या अशा गोष्टी अधिक चांगल्या शब्दांमध्ये सांगितल्या जातात. मात्र मी ज्या वेळी तिथे मनोरंजनसृष्टीत एन्ट्री करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा फार सोफिस्टीकेटेड शब्द वापरले जायचे नाहीत. त्यांनी मला माझ्या तोंडावर या शब्दांमध्ये सांगितले, म्हणून मी सुद्धा त्यांच्या तोंडावर नकार दिला होता,” असं प्रश्नाला उत्तर देताना सुरवीनने म्हटलं. “तुम्ही दक्षिणेत गेला तर तुम्हाला वजन वाढवावं लागतं. तुम्ही तिथे काम करुन इथे (हिंदी चित्रपटांमध्ये) परत येता तेव्हा तुम्हाला वजन कमी करावे लागते,” असंही सुरवीनने पुढे म्हटलं.
‘क्रिमिनल जस्टिस’च्या चौथ्या सीझनच्या माध्यमातून सुरवीन प्रेक्षकांच्या भेटीस आली. रोहन सिप्पी दिग्दर्शित ‘क्रिमिनल जस्टिस’मध्ये पंकज त्रिपाठी, आशा नेगी, श्वेता बसू प्रसाद, मीता वशिष्ठ, आणि झीशान अय्युब आदी प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेतील कामासाठीही सुरवीनचं कौतुक केलं जात आहे.
हेही वाचा :