कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
गुजरातमधील अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला.(death) त्याचा कौतुक सोहळा कर्नाटकच्या बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असताना पोलिसांनी घेतलेल्या आक्रस्तळी भूमिकेने या स्टेडियमवर काही जणांना मृत्यूशी “सामना” करावालागला. दहा जण चेंगराचेंगरीत मरण पावले. अनेक जण गंभीर जखमी झाले. स्टेडियमवर असा मरणाचा कल्लोळ उसळला असताना क्रिकेट वीरांचं सेलिब्रेशन मात्र सुरूच होतं. जणू या क्रिकेटपटूंकडून असंवेदनशीलतेचे षटकार मारले जात होते. स्टेडियम वर क्रिकेट प्रेमी गुदमरून कायमचे पायचीत होत होते.
मृत्यूला कवटाळत होते आणि विराट कोहली सह अन्य क्रिकेटपटू चाहत्यांना फ्लाईंग किस देत होते. एकीकडे मृत्यूचे तांडव आणि दुसरीकडे क्रिकेटपटूंचा जल्लोष असे विरोधाभासाचे चित्र या स्टेडियमवर पाहायला मिळाले.
देशात आय पी एल चे क्रिकेट सामने एप्रिल पासून सुरू होते. दिनांक 22 एप्रिल रोजी पहेलगाम दहशतकांड घडले, त्यानंतर युद्धसदृश्य वातावरण तयार झाले आणि त्यामुळे हे क्रिकेटचे सामने स्थगित करण्यात आले होते.
युद्धग्रस्त वातावरण संपुष्टात आल्यानंतर हे सामने पुन्हा सुरू झाले. (death)अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध पंजाब असा अंतिम सामना रंगला.आणि हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने जिंकला.
बुधवारी या संघाच्या कौतुकाचा सोहळा बंगळुरू येथील डी. चिन्नास्वामी स्टेडियमवर सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.
तब्बल दीड तपानंतर रॉयल चॅलेंजर्स ने हा आयपीएल कप जिंकल्यामुळे संपूर्ण कर्नाटकात जल्लोषी वातावरण होते. हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी डी. चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेट प्रेमींनी अफाट गर्दी केली होती. स्टेडियम गर्दीने फुलून गेले होते, बाहेरही तितकीच गर्दी होती. बाहेरच्या गर्दीला आत जावयाचे होते आणि त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. क्रिकेट प्रेमींनी आत जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तथापि पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिसांना मागे हटवून क्रिकेट प्रेमी आत जात असताना पोलिसांनी अचानक बेछूट लाठीचार्ज सुरू केला. चेंगराचेंगरी साठी हेच निमित्त ठरले.
कोणत्याही निमित्तानेप्रमाणापेक्षा अधिक गर्दी झाली कि, या गर्दीचे नियोजन करण्याऐवजी पोलिसांकडूनलाठीमाराचा पर्याय निवडला जातो. आणि मग त्यातून अशा काही अप्रिय घटना घडतात. बंगळुरू येथील स्टेडियमवर पोलिसांनी संयमाची भूमिका घेतली असती तर काही क्रिकेट प्रेमींना मृत्यूशी सामना करावा लागला नसता.(death)अठरा वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स ने आयपीएल जिंकल्यामुळे स्टेडियमवर होणार असलेल्या सत्कार समारंभाला अर्थात क्रिकेट वीरांच्या कौतुक सोहळ्यालाचाहत्यांची अफाट गर्दी होणारआणि त्यामुळे होणाऱ्या गर्दीचे नियोजन कसे करायचे याचा विचार आयोजकांनी करणे आवश्यक होते. तथापि आयोजकांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा वापरली नव्हती. कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नव्हत्या.
त्यामुळे स्टेडियमवर जे काही मृत्यूचे तांडव झाले त्याची जबाबदारी आयोजकांच्यावर येते आणि म्हणूनच त्यांना याप्रकरणी जबाबदार धरले पाहिजे.अतिशय चुरशीच्या लढतीत यश मिळाल्यानंतरहे यश क्रिकेटपटूंनी विनम्रपणे
स्वीकारले पाहिजे. आपण केवळ क्रिकेट प्रेमींच्या प्रेमामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेलो आहोत याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक होते.पण स्टेडियमवर अशी चेंगराचेंगरी सुरू असताना, क्रिकेट चाहत्यांवर पोलीस अमानुष लाठीमार करत असताना, चेंगराचेंगरीतअनेक जण मृत्यूला कवटाळत असताना समारंभाचे आयोजक जल्लोषात मग्न होते. क्रिकेटपटू गर्दीला अभिवादन करत होते. त्यांना फ्लाईंग किस देत होते. वास्तविक आयोजकांनी आणि रॉयल चॅलेंजर्स च्या विजेत्यांनी हा कौतुक सोहळा किंवा सेलिब्रेशन तातडीने बंद करणे आवश्यक होते. पण त्यांच्याकडून तसे झाले नाही.
त्यांच्या या असंवेदनशीलतेबद्दल सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत आणि ते स्वाभाविकही आहे.आयपीएल तसेच बीसीसीआय यांच्याकडूनया घटनेबद्दल दुःख व्यक्त होण्याऐवजी, जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न झाले.
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी डी शिवकुमार यांनी घडलेल्या घटनेबद्दल सर्व सामान्य जनतेचे माफी मागितली आहे. गर्दीचे नियोजन करण्यात आम्ही कमी पडलो अशी कबुली त्यांनी दिली आहे. मात्र सेलिब्रेशन चे आयोजक, बीसीसीआय
यांच्याकडून ह्रदयशून्यतेचे दर्शन घडले. आता या एकूण प्रकरणाची शासनाकडून चौकशी होईल. त्यासाठी एखादी समिती नेमली जाईल. जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना तसेच जखमी झालेल्यांना आर्थिक सहाय्य दिले जाईल. पण ज्यांच्यावर या जबाबदारीची निश्चिती केली जाईल त्यांना शिक्षा केव्हा होणार याची मात्र प्रतीक्षा करावी लागेल. पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत याच्यासाठीच्या काही उपाययोजना केल्या जातील.
पण त्या कागदावरच राहतील.
हेही वाचा :