कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहेलगाम येथे धर्म विचारून पर्यटकांना, त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या झाडून ठार मारणारे दहशतवादी हे पाकिस्तानचे होते हे पुराव्या सह स्पष्ट झाल्यानंतरच भारताने पाकिस्तान विरुद्ध कायदेशीर स्ट्राइक(strike) केला आहे. ही नजीकच्या काळात होणाऱ्या मोठ्या कारवाईची सुरुवात असल्याचे मानले जाते.

मंगळवारी निष्पाप पर्यटकांवर झालेला हल्ला हा “उंटाच्या पाठीवरच्या ओझ्यावरील शेवटची काडी” ठरल्याने पाकिस्तानला आता त्याची किंमत मोजावी लागणार आहे. बटेंगे तो कटेंगे च्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत तयार झालेल्या असहिष्णू वातावरणाचा परिपाक म्हणजे हा हल्ला असल्याचा जावई शोध काहीजणांनी लावला असला तरी विरोधी पक्षांनी भारत सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला तरी तो अभिप्रेतच होता.
भारत सरकारने पाकिस्तानची असलेले द्विपक्षीय संबंध तोडून टाकताना काही कठोर निर्णय घेतले आहेत की जे पूर्वी कधीही घेतले गेले नव्हते. सुमारे 65 वर्षांपूर्वी झालेला सिंधू जलवाटप करा भारताने खंडित केला आहे. हा सर्वात मोठा वॉटर स्ट्राइक(strike) आहे. या निर्णयाने पाकच्या तोंडचे पाणी पळालेले आहे. तेथील शेती आणि वीज निर्मिती प्रकल्प या निर्णयामुळे अडचणीत येणार आहेत. पाणी ही जीवनावश्यक बाब असल्याने ते कोणाला खंडित करता येणार नाही अशी भूमिका घेऊन पाकिस्तान हा विषय जागतिक मंचावर मानण्याची शक्यता असली तरी कोणताही देश भारताच्या या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही.
गुरुवारी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक होत असतानाच सुरत आय एन एस या लढाऊ जहाजावरून क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. यावरून भारत हा कोणत्या मानसिकतेत आहे हे स्पष्ट होते. श्रीनगर पासून अवघ्या 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या पहलगाम येथे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दहशतवाद्यांच्या या नव्या स्ट्रॅटेजीमुळे भारतामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष निर्माण होईल, अशी स्वप्ने पाहणाऱ्यांचा भारतीयांनी मुखभंग केला आहे. पर्यटकांना धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर देशभर पाकिस्तान विरुद्ध उडालेला आंदोलनाचा भडका म्हणजे
उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आणि ती भारतातील मुसलमानांच्या विरुद्धची नव्हती.

जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही भारतीय लष्करावर नाही आणि नव्हती. लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही तेथील ओमर अब्दुल्ला सरकारची आहे. त्यानंतर दुय्यम स्थानावर सीमा सुरक्षा दल वगैरे यंत्रणा येतात. पहलगाम येथे जाताना पाच चेक पोस्ट नाके लागतात. या नाक्यावर कडक तपासणी होऊनच पर्यटकांना किंवा तेथील नागरिकांना सोडले जाते.
इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही दहशतवादी पहलगाम मध्ये घुसले कसे हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. स्थानिक स्लीपर सेलच्या सदस्यांनी या दहशतवाद्यांना काही दिवसांपूर्वी आत मध्ये घेतले असावे. पर्यटकांच्या वर हल्ला करण्याची चांगली वेळ कोणती याची माहिती स्थानिक स्लीपर सेल कडूनच मिळाल्यानंतर हा हल्ला करण्यात आलेला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसने या संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्रपणे बैठक बोलावली होती(strike). उद्धव ठाकरे शिवसेना गटाने नवी दिल्लीतील बैठकीला आपण उपस्थित राहू शकत नाही पण केंद्र सरकार या संदर्भात जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असे या गटाच्या खासदारांनी स्पष्ट केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वी झालेल्या युद्धातही सिंधू जल वाटप करार सुरूच ठेवण्यात आलेला होता. प्रत्येक युद्धाच्या वेळी हा करार खंडित करण्यात यावा अशी मागणी केली गेली होती. पण केवळ मानवता म्हणून भारत सरकारने हा करार मोडीत काढलेला नव्हता. यंदा मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा करार पहिल्यांदाच स्थगित करण्यात आलेला आहे. पाकिस्तानाच्या दुतावासातील अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही देश सोडून जाण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे.
हे चालू असतानाच नवदलाच्या आय एन एस सुरत या लढाऊ जहाजावरून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. ज्यांनी हल्ला केला त्यांना धडकी भरेल इतकी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत भारत आहे. आणि क्षेपणास्त्र चाचणी करून पाकिस्तानला तसा एक संदेश दिला आहे.
हेही वाचा :
रितेश देशमुख हळहळला! ‘राजा शिवाजी’च्या कलाकाराचा मृत्यू
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘असं’ केल्यास थेट निलंबन होणार
उष्णतेची लाट आणि गारपिटीचा धोका राज्यातील 15 जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट