IPL 2025 दरम्यान विमानतळावर ९ किलो ड्रग्जची तस्करी, मुद्देमालासह ‘हा’ क्रिकेटपटू पोलिसांच्या ताब्यात.. 

सध्या भारतात आयपीएल २०२५ चा १८ व्या हंगामाचा थरार रंगला आहे. क्रिकेट(cricketer) चाहते जगातील या सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध लीगचा आनंदात पूर्ण बुडलेले आहेत. आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ५० सामने खेळवण्यात आले आहेत. अशातच क्रिकेट जगतातून एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. एका क्रिकेटपटूला विमानतळावरून ९ किलो ड्रग्जसह ताब्यात घेण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच हादरा बसला आहे.

याबबत अधिक माहिती अशी की, कॅनडा संघाचा स्टार फलंदाज(cricketer) निकोलस किर्टनला पोलिसांनी अटक केली आहे. बार्बाडोसमधील ग्रँटली अॅडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ९ किलो ड्रग्जसह अटक केली आहे. ही बातमी जमैका ग्लीनरच्या अहवालाने शेअर करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निकोलस २० पौंड (९ किलो) गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळत आहे. कॅनडामध्ये ५७ ग्रॅमपर्यंत गांजा बाळगणे गुन्हा मानला जात नसला तरी ते सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाण्याची परवानगी नाही. परंतु निकोसलकडे निर्धारित मानकांपेक्षा जवळजवळ नऊ पट अधिक औषधे असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांकडून अटक करण्यात आली.

निकोलसच्या या गुन्ह्यानंतर क्रिकेट चाहत्यांकडून त्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. चाहत्यांना असा विश्वास वाटत आहे की, की अशा गोष्टी करणाऱ्या लोकांना क्रिकेटमधून बाहेर काढून टाकायला हवे. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅनेडियन संघात स्थान देण्यात येऊ नये. अशा परिस्थितीत, निकोलस नियमांनुसार कॅनेडियन संघासोबत देखील खेळू शकणार नाही.

निकोलस आतापर्यंत एकूण २१ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळला आहे. या काळात त्याने ५१४ धावा काढल्या आहेत. तसेच त्याने २८ टी-२० सामने देखील खेळले आहेत. निकोलसने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये ६२७ धावा केल्या आहेत. या मध्ये एक उल्लेखनीय असे की, निकोलस किर्टन हा डावखुरा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांचा जन्म बार्बाडोसमध्ये झाला आहे. याआधी तो वेस्ट इंडिजच्या अंडर १७ आणि अंडर १९ संघांकडून देखील खेळला आहे.

काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या विजयासह मुंबईने लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवला आहे. आरआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत मुंबईने २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघ सर्वबाद ११७ धावाच करू शकला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर १०० धावांनी पराभूत केले.

हेही वाचा :

लाडक्या बहीणींना एप्रिल-मे महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार?

4 संकेतावरुन ओळखा जोडीदाराचं तुमच्यासोबतचं नातं मनातून तुटलंय

धक्कादायक! Mumbai Indians वर फिक्सिंगचा आरोप! पंचांकडून Rohit Sharma ला मदत?