‘तिच्या आई-वडिलांनी माझा संसार मोडला!’ घटस्फोटावर संजूबाबांचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त कायमच आपल्या खासगी (broke)आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. तिनदा विवाहबद्ध झालेल्या संजूबाबाने पहिलं लग्न 1987 मध्ये अभिनेत्री ऋचा शर्मा हिच्यासोबत केलं होतं. त्यांच्या लग्नानंतर एका वर्षातच दोघांना कन्यारत्न झालं, पण त्यानंतर ऋचाला ब्रेन ट्यूमर झाल्याचं निदान झालं आणि दोघांच्या नात्यात तणाव सुरू झाला. संजय आणि ऋचाचा घटस्फोट का झाला यावर अनेक तर्क लावले गेले. काहींनी आरोप केला की संजयने ऋचाच्या आजारामुळे तिला सोडलं. मात्र आता संजय दत्तने एका जुन्या मुलाखतीत स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत आणि घटस्फोटामागील कारणांबाबत थेट भाष्य केलं आहे.

संजय दत्त म्हणाला, “हे आरोप निराधार आहेत. मी ऋचावर प्रेम करत होतो आणि तिच्या कठीण काळात तिला धैर्य दिलं. मी तिला कधीही एकटी सोडलं नाही. (broke)या गोष्टी फक्त माझ्या बदनामीसाठी पसरवल्या गेल्या.”संजूने पुढे सांगितलं, “आमच्या नात्यात तिच्या आई-वडिलांचा सतत हस्तक्षेप असायचा. त्यांनी माझ्यावर अनेक आरोप लावले. त्या हस्तक्षेपामुळेच आमचं नातं बिघडलं. फक्त तिचे आई-वडीलच नाही, तर बहिणीसुद्धा आमच्यात पडायची. नवरा-बायकोच्या नात्यात तिसऱ्यांचं स्थान नसतं.”आज संजय दत्त तिसरी पत्नी मान्यता दत्त आणि त्यांच्या जुळ्या मुलांसोबत आनंदी संसार करत आहे. मात्र, ऋचा शर्मा आणि त्याच्या नात्याची ही बाजू पुन्हा एकदा चर्चेत(broke)आली आहे.

हेही वाचा :

पंतप्रधान नट-नट्यांसोबत व्यस्थ अन्…; खासदार संजय राऊतांचा घणाघात

4 संकेतावरुन ओळखा जोडीदाराचं तुमच्यासोबतचं नातं मनातून तुटलंय

…अन् मॅचनंतर त्याने थेट पॉन्टिंगच्या बायकोलाच मारली मिठी! भारतीय क्रिकेटरचा Video चर्चेत